शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून दुष्काळावर मात

By admin | Updated: July 30, 2016 00:31 IST

योेगेश गुंड, अहमदनगर लाखो वृक्षांचे संवर्धन करून या गावाने दुष्काळावर कायमची मात तर केलीच पण संत तुकाराम वनग्राम पुरस्कारावर आपले नाव कोरले.

योेगेश गुंड, अहमदनगरकधीकाळी गर्द झाडांनी नटलेल्या या गावातील हिरवे सौंदर्य काळाच्या ओघात लोप पावले, गावाला तीव्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या, पर्जन्यमान घटले, शेतीतील उत्पन्न घसरले, पाण्याचे स्रोत आटू लागले, अशा साडेसातीत गावाने केलेल्या विचारमंथनातून गावातील शिवारात झाडे लावण्याचा निर्णय झाला. गाव हात झटकून कामाला लागले आणि कधी काळी लयास गेलेले गावाचे हिरवे सौंदर्य गावाने मोठ्या जिद्दीने व आत्मविश्वासाने परत मिळवले. लाखो वृक्षांचे संवर्धन करून या गावाने दुष्काळावर कायमची मात तर केलीच पण संत तुकाराम वनग्राम पुरस्कारावर आपले नाव कोरले.गुंडेगाव (ता. नगर) डोंगरांच्या कुशीत वसलेले नगर तालुक्याचे शेवटचे टोक. ८५० एकर क्षेत्राचा डोंगर परिसर कधीकाळी गर्द हिरव्यागर झाडांनी नटला होता. पण काळाच्या ओघात हे हिरवे सौंदर्य नष्ट झाले. सारे डोंगर उघडे आणि बोडखे दिसू लागले. पूर्वीचे वैभव लोप पावले. दुष्काळाचे चटके गावाला असह्य करू लागले, पाण्याचे स्रोत आटू लागले, शेतीमधील उत्पादनात घट झाली, दूध उत्पादन कमी झाले. गावाचे कमी झालेले पर्जन्यमान वाढवण्यासाठी गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे, हे ओळखून गावाने विचारविनिमय सुरु केला. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, तत्कालीन सरपंच संजय कोतकर यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावातील डोंगर परिसर पुन्हा हिरवागार करण्याची कल्पना बोलून दाखवली. गावातील ज्येष्ठ आणि तरुण मंडळी एकत्र आली. पुढील दहा वर्षांचा वृक्ष लागवडीचा आराखडा तयार करण्यात आला. चारा बंदी, कुऱ्हाड बंदी यासारख्या कल्पनांतून काहींचा विरोध पत्करून या संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली. धावडेवाडीसारख्या डोंगर परिसरात दीड लाख औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले. स्व. परसराम धावडे यांनी वाडीतील लोकांना सोबत घेऊन या जंगलाचे व वृक्षांचे संवर्धन केले. गावातील सर्वांनी सहभाग दिल्याने दुष्काळात लाखो झाडे जगवली गेली.काही दिवसातच उघडे आणि बोडखे दिसणारे गावाचे शिवार आणि डोंगर परिसर हिरवागार दिसू लागला. यावर्षीही गावाने सर्वांना सोबत घेऊन सुमारे दीड लाख रोपे लावली.सरपंच डॉ. नयना भापकर, संजय कोतकर यांनी अबालवृद्धांना सोबत घेऊन ही किमया करून दाखवली. हळूहळू गाव दुष्काळावर मात करू लागला. एवढेच नाही तर राज्य सरकारने याची दखल घेऊन गावाला राज्यातील प्रथम क्रमांकाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. गावातील दुष्काळावर मात करण्यासाठी गावातील अबालवृद्ध, तरूण, महिला, विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी श्रमदान करून गावाला पूर्वीचे वैभव मिळवण्यासाठी कष्ट केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण यांचे सहकार्य लाभले. यामुळे हे यश गावाला मिळवता आले.—बाळासाहेब हराळ, जि. प. सदस्य