शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

निष्काळजीपणामुळे गावाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : कोरोनाच्या उपचारामध्ये दाखविलेला निष्काळजीपणा संपूर्ण गावाच्याच अंगलट आल्याचा प्रकार तालुक्यातील कान्हेगाव येथे घडला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : कोरोनाच्या उपचारामध्ये दाखविलेला निष्काळजीपणा संपूर्ण गावाच्याच अंगलट आल्याचा प्रकार तालुक्यातील कान्हेगाव येथे घडला आहे. एक हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात गेल्या काही दिवसांत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिबिर घेऊन दररोज शंभरावर चाचण्या कराव्या लागत आहेत.

प्रवरा नदीच्या काठावर वसलेले कान्हेगाव हे घनदाट लोकवस्तीचे गाव आहे. अवघे दोनशेच्यावर कुटुंब येथे राहतात. श्रीरामपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील या गावाला कोरोनाचा अक्षरश: विळखा पडला आहे.

सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या काही संशयितांनी निष्काळजीपणा केला. रुग्णालयात उपचार घेतले नाही. त्याचा सर्वांनाच फटका बसला. रुग्णसंख्येने शतक गाठण्याची येथे भीती व्यक्त होत आहे. गावात रविवारी एकाच दिवशी कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने कान्हेगावचा इतर गावांशी संपर्क तोडला आहे. गावांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. संपूर्ण गावात सध्या शुकशुकाट आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. जोशी यांनी दररोज शंभर अँटिजेन चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले. ३००हून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मालुंजे व पढेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी गावावर लक्ष ठेवून आहेत. संशयिताना श्रीरामपूर येथील कोरोना उपचार केंद्रावर पाठविले जात आहे. सौम्य लक्षणाच्या कोणत्याही रुग्णाला घरी ठेवले जात नाही. रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर, तसेच नगर येथील सिव्हिल रुग्णालय व इतर खासगी ठिकाणी उपचार सुरू आहेत, असे त्या म्हणाल्या.

---------

चाचण्यांची भीती बाळगू नका

सर्दी-खोकला व ताप अंगावर जास्त दिवस काढू नये. संशय आल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी. त्यामुळे कुटुंब व गाव सुरक्षित राहील, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी यांनी केले आहे.

-----------