शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: March 13, 2016 23:53 IST

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे.

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे. वेदनारहित आजार असल्याने तो कळायच्या आतच माणसाचा घात करतो, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी केले.मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी नगर येथील स्टार जनरल केअर अ‍ॅण्ड आयसीयू युनितटर्फे मधुमेह आजार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत रविवारी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात व्याख्यान आणि तपासणी शिबिर झाले. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. रावसाहेब अनभुले, डॉ. रणजित सत्रे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. श्रावणी कवडे, अपर्णा चव्हाण यांची उपस्थिती होती.मधुमेहाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. बहुरुपी म्हणाले, मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार सर्वात वाईट आजार आहे. युवा पिढीत आहाराचे अज्ञान आणि व्यायामाचा अभाव ही दोन कारणे हा आजार वाढण्यामागे आहेत. उपाशीपोटी १२६ च्या पुढे आणि जेवल्यानंतर २०० पेक्षा जास्त रक्तामध्ये साखर असेल तर मधुमेह झाला, असे समजावे. मधुमेहामुळे पहिल्यांदा डोळे खराब होतात आणि ते करोडो रुपये खर्च केले तरी बरे होत नाहीत. लघवी जास्त होेणे, जळजळ, जंतुसंसर्ग, अस्वस्थता, वजन कमी होणे, सतत खावेसे वाटणे आदी मधुमेहाची लक्षणे आहेत. यावेळी त्यांनी मधुमेहाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आहार आणि मधुमेह झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा चव्हाण म्हणाल्या, मानसिक शांतीसाठी व्यायाम करावा. खाण्यावर, कामावर प्रत्येकाने मर्यादा घातल्यास ताण कमी होईल. यावेळी स्लाईड शोद्वारे मधुमेहाची तीव्रता लक्षात आणून दिली. शहरात लवकरच मधुमेह क्लब स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित सत्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)