शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: March 13, 2016 23:53 IST

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे.

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे. वेदनारहित आजार असल्याने तो कळायच्या आतच माणसाचा घात करतो, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी केले.मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी नगर येथील स्टार जनरल केअर अ‍ॅण्ड आयसीयू युनितटर्फे मधुमेह आजार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत रविवारी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात व्याख्यान आणि तपासणी शिबिर झाले. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. रावसाहेब अनभुले, डॉ. रणजित सत्रे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. श्रावणी कवडे, अपर्णा चव्हाण यांची उपस्थिती होती.मधुमेहाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. बहुरुपी म्हणाले, मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार सर्वात वाईट आजार आहे. युवा पिढीत आहाराचे अज्ञान आणि व्यायामाचा अभाव ही दोन कारणे हा आजार वाढण्यामागे आहेत. उपाशीपोटी १२६ च्या पुढे आणि जेवल्यानंतर २०० पेक्षा जास्त रक्तामध्ये साखर असेल तर मधुमेह झाला, असे समजावे. मधुमेहामुळे पहिल्यांदा डोळे खराब होतात आणि ते करोडो रुपये खर्च केले तरी बरे होत नाहीत. लघवी जास्त होेणे, जळजळ, जंतुसंसर्ग, अस्वस्थता, वजन कमी होणे, सतत खावेसे वाटणे आदी मधुमेहाची लक्षणे आहेत. यावेळी त्यांनी मधुमेहाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आहार आणि मधुमेह झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा चव्हाण म्हणाल्या, मानसिक शांतीसाठी व्यायाम करावा. खाण्यावर, कामावर प्रत्येकाने मर्यादा घातल्यास ताण कमी होईल. यावेळी स्लाईड शोद्वारे मधुमेहाची तीव्रता लक्षात आणून दिली. शहरात लवकरच मधुमेह क्लब स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित सत्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)