शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: March 13, 2016 23:53 IST

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे.

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे. वेदनारहित आजार असल्याने तो कळायच्या आतच माणसाचा घात करतो, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी केले.मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी नगर येथील स्टार जनरल केअर अ‍ॅण्ड आयसीयू युनितटर्फे मधुमेह आजार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत रविवारी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात व्याख्यान आणि तपासणी शिबिर झाले. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. रावसाहेब अनभुले, डॉ. रणजित सत्रे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. श्रावणी कवडे, अपर्णा चव्हाण यांची उपस्थिती होती.मधुमेहाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. बहुरुपी म्हणाले, मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार सर्वात वाईट आजार आहे. युवा पिढीत आहाराचे अज्ञान आणि व्यायामाचा अभाव ही दोन कारणे हा आजार वाढण्यामागे आहेत. उपाशीपोटी १२६ च्या पुढे आणि जेवल्यानंतर २०० पेक्षा जास्त रक्तामध्ये साखर असेल तर मधुमेह झाला, असे समजावे. मधुमेहामुळे पहिल्यांदा डोळे खराब होतात आणि ते करोडो रुपये खर्च केले तरी बरे होत नाहीत. लघवी जास्त होेणे, जळजळ, जंतुसंसर्ग, अस्वस्थता, वजन कमी होणे, सतत खावेसे वाटणे आदी मधुमेहाची लक्षणे आहेत. यावेळी त्यांनी मधुमेहाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आहार आणि मधुमेह झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा चव्हाण म्हणाल्या, मानसिक शांतीसाठी व्यायाम करावा. खाण्यावर, कामावर प्रत्येकाने मर्यादा घातल्यास ताण कमी होईल. यावेळी स्लाईड शोद्वारे मधुमेहाची तीव्रता लक्षात आणून दिली. शहरात लवकरच मधुमेह क्लब स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित सत्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)