शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

कांद्याचे कर्ज वाढल्यामुळे शेतकऱ्याने संपविली मुळा नदीत जीवनयात्रा

By admin | Updated: April 8, 2017 18:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने घोरपडवाडी (ता़ राहुरी) येथील शेतकरी देवराम रखमा शेंडगे (वय ५५) यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठा वाढला.

आॅनलाईन लोकमतराहुरी (अहमदनगर), दि़ ८- गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने घोरपडवाडी (ता़ राहुरी) येथील शेतकरी देवराम रखमा शेंडगे (वय ५५) यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठा वाढला. त्यामुळे त्यांनी मुळा नदी पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली़ शनिवारी मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. घोरपडवाडी येथे शेंडगे यांना तीन एकर जमीन आहे़ त्यांनी दोन एकर क्षेत्रावर पुन्हा कांदा पीक घेतले़ मात्र सोसायटी कर्ज व अन्य हात उसने घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले़ कर्जाचा डोंगर वाढल्याने गेल्या काही दिवासांपासून शेंडगे अस्वस्थ होते़ नातेवाईकांकडून पैसे घेऊन येतो, असे घरी सांगून देवराम शेंडगे हे बाहेर गावी गेले़ गेल्या तीन दिवसांपासून नातेवाईकांकडे शोध सुरू होता़ शनिवारी डिग्रस बंधाऱ्यामध्ये प्रेत आढळल्याचे नातेवाईकांना समजले़ त्यानंतर दुपारी चिरफाड बंगल्यामध्ये असलेला मृतदेह नातेवाईकांनी ओळखला़डिग्रसचे पोलीस पाटील रावसाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल मोकाटे करीत आहेत़ मयत शेंडगे यांच्यामागे पत्नी,दोन मुले असा परिवार आहे़ राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़मुळा नदी पात्रात विवस्त्रावस्थेत ५५ वर्षीय पुरुषाचे प्रेत आढळले़ त्याच्या छातीवर जखमा आढळून आल्या़ २० फुटावरून उडी मारल्यास किंवा अन्य कारणाने जखम होऊ शकते़ पोलीस तपासात पुढील माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर यांनी सांगितले़दर कोसळल्याने आर्थिक फटकानोटाबंदी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राहुरी तालुक्यातील बागायती भागालाही जोरदार आर्थिक फटका बसला आहे़ शेतकऱ्यांंवर मोठ्या प्रमाणात सहकारी सोसायट्या, बँका, सावकार व नातेवाईक यांचे कर्ज वाढले आहे़ कांद्याला सरासरी चार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे़