शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पर्जन्यमान चांगले असल्याने यंदाचा खरीप जोमात- कृषी अधिकारी सुनीलकुमार राठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:36 IST

अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. त्यामुळे शेतकºयांना बियाणे, खतांचा तुटवडा जाणवणार नाही. परिणामी यंदा खरिपाचे उत्पादन नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी ‘लोकमत’ संवादादरम्यान व्यक्त केला. 

- यंदाच्या खरिपाची स्थिती कशी राहील?राज्यात यंदा चांगला पाऊस आहे. त्यातही नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खरिपाचे पेरणी क्षेत्र नक्कीच वाढेल. शेतकºयांनी जमिनीत चांगली ओल असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. ओल कमी असेल तर बियाणे खराब होऊन उगवण व्यवस्थित होत नाही. यंदा खरीप पिकांचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे साडेचार लाख आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ टक्क््यापर्यंत पेरणी झालेली आहे. त्यात झपाट्याने वाढ होत आहे. 

- शेतकºयांनी कोणत्या पिकांना प्राधान्य द्यावे?भौगोलिक स्थितीनुसार पीक पद्धती बदलतात. जिल्ह्यात दक्षिण भागात खरिपाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने मूग, उडीद पिकांची पेरणी वेळेवर झाली. त्यामुळे ही पिके वेळेवर निघून जमीन पुन्हा रब्बीसाठी मोकळी होईल. याशिवाय यंदा बाजरी, सोयाबीन, कपाशीचे क्षेत्रही मोठे आहे. 

- बियाणे, खतांची उपलब्धता कशी आहे?खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के बियाणे व ५१ टक्के खतांचा पुरवठा झाला आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला. परंतु आता तो पूर्ववत होत आहे. शासनाकडे ५७ हजार ७०० क्विंटल बियाणे व २ लाख ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवली होती. १५ जूनपर्यंत यातील ४० हजार क्विंटल म्हणजे ७० टक्के बियाणे उपलब्ध झाले असून १ लाख ४० हजार मेट्रिक टन (५१ टक्के) खतांची उपलब्धता झाली आहे.  प्रस्तावित क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाजरीचे असून त्याखालोखाल १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. याशिवाय ७९ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर ७५ हजार हेक्टरवर मका पेरणीचेही नियोजन आहे. 

- कोरोना स्थितीचा शेतकरी, शेतीवर काही परिणाम?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शासनाने कृषी व कृषीसंलग्न सेवांना मुभा दिली होती. त्यामुळे फारशा अडचणी आल्या नाहीत. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतकºयांना बियाणे, खते खरेदीसाठी येता येत आहे. बियाणे व खतांची वाहतुकही होत आहे. त्यामुळे कोरोना किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा परिणाम शेतीवर झालेला दिसत नाही. ------------ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर