शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पर्जन्यमान चांगले असल्याने यंदाचा खरीप जोमात- कृषी अधिकारी सुनीलकुमार राठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:36 IST

अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. त्यामुळे शेतकºयांना बियाणे, खतांचा तुटवडा जाणवणार नाही. परिणामी यंदा खरिपाचे उत्पादन नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी ‘लोकमत’ संवादादरम्यान व्यक्त केला. 

- यंदाच्या खरिपाची स्थिती कशी राहील?राज्यात यंदा चांगला पाऊस आहे. त्यातही नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खरिपाचे पेरणी क्षेत्र नक्कीच वाढेल. शेतकºयांनी जमिनीत चांगली ओल असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. ओल कमी असेल तर बियाणे खराब होऊन उगवण व्यवस्थित होत नाही. यंदा खरीप पिकांचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे साडेचार लाख आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ टक्क््यापर्यंत पेरणी झालेली आहे. त्यात झपाट्याने वाढ होत आहे. 

- शेतकºयांनी कोणत्या पिकांना प्राधान्य द्यावे?भौगोलिक स्थितीनुसार पीक पद्धती बदलतात. जिल्ह्यात दक्षिण भागात खरिपाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने मूग, उडीद पिकांची पेरणी वेळेवर झाली. त्यामुळे ही पिके वेळेवर निघून जमीन पुन्हा रब्बीसाठी मोकळी होईल. याशिवाय यंदा बाजरी, सोयाबीन, कपाशीचे क्षेत्रही मोठे आहे. 

- बियाणे, खतांची उपलब्धता कशी आहे?खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के बियाणे व ५१ टक्के खतांचा पुरवठा झाला आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला. परंतु आता तो पूर्ववत होत आहे. शासनाकडे ५७ हजार ७०० क्विंटल बियाणे व २ लाख ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवली होती. १५ जूनपर्यंत यातील ४० हजार क्विंटल म्हणजे ७० टक्के बियाणे उपलब्ध झाले असून १ लाख ४० हजार मेट्रिक टन (५१ टक्के) खतांची उपलब्धता झाली आहे.  प्रस्तावित क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाजरीचे असून त्याखालोखाल १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. याशिवाय ७९ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर ७५ हजार हेक्टरवर मका पेरणीचेही नियोजन आहे. 

- कोरोना स्थितीचा शेतकरी, शेतीवर काही परिणाम?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शासनाने कृषी व कृषीसंलग्न सेवांना मुभा दिली होती. त्यामुळे फारशा अडचणी आल्या नाहीत. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतकºयांना बियाणे, खते खरेदीसाठी येता येत आहे. बियाणे व खतांची वाहतुकही होत आहे. त्यामुळे कोरोना किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा परिणाम शेतीवर झालेला दिसत नाही. ------------ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर