शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

दुष्काळाच्या झळा : विकतच्या पाण्यावर जगते संपूर्ण गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:45 IST

तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत.

मुन्ना पठाण कर्जत : तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे टँकरची मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे. तर काही गावात विकत पाणी घेण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ अधिक गडद होताना दिसत आहे.कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात या गावात पाणी योजनेचे तिन्ही उद्भव कोरडे पडल्याने गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांना एक बॅरल २०० लिटर पाण्यासाठी ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहे. शाश्वत पाणी पुरवठा योजना नसल्याने गावासमोर पुढच्या काळात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे.या गावाची लोकसंख्या साधारण २२५० च्या जवळपास आहे. या गावाला पूर्वी दोन विहिरींद्वारे पाणी पुरवठा होता. परंतु काळानुरूप दोन्ही उद्भव कोरडे पडल्याने काही महिन्यांपूर्वी नवीन विहीर घेण्यात आली.पाणी लागल्याने पाणी पुरवठाही सुरू झाला. परंतु त्या विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यातूनच आता या संपूर्ण गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खासगी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतात नापिकी व गावात पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाला टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. भविष्यात तुकाई चारी किंवा सिंचन योजनेच्या माध्यमातून गावाजवळील तलावात कुकडीचे पाणी सोडल्यास गावाच्या पाणी योजनेचा मोठा प्रश्न सुटेल. यासाठी भविष्यात तुकाई चारी प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.गावाच्या पाणी योजनेच्या जुन्या दोन व नवीन एक विहीर आटल्याने सध्या गावात पाणी टंचाई असल्याने २०० लिटर पाण्यासाठी ७० ते८० रूपये मोजावे लागत आहेत. -परशुराम हरी काळदाते, ग्रामस्थ, चिंचोली काळदात.पाणी टंचाईमुळे टँकरचा प्रस्ताव दाखल केला आहे. पाणी योजनेच्या विहिरीला आडवे बोअर घेऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - रघुआबा काळदाते, उपसरपंच, चिंचोली काळदात

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर