शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

दुष्काळाच्या झळा : विकतच्या पाण्यावर जगते संपूर्ण गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:45 IST

तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत.

मुन्ना पठाण कर्जत : तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे टँकरची मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे. तर काही गावात विकत पाणी घेण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ अधिक गडद होताना दिसत आहे.कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात या गावात पाणी योजनेचे तिन्ही उद्भव कोरडे पडल्याने गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांना एक बॅरल २०० लिटर पाण्यासाठी ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहे. शाश्वत पाणी पुरवठा योजना नसल्याने गावासमोर पुढच्या काळात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे.या गावाची लोकसंख्या साधारण २२५० च्या जवळपास आहे. या गावाला पूर्वी दोन विहिरींद्वारे पाणी पुरवठा होता. परंतु काळानुरूप दोन्ही उद्भव कोरडे पडल्याने काही महिन्यांपूर्वी नवीन विहीर घेण्यात आली.पाणी लागल्याने पाणी पुरवठाही सुरू झाला. परंतु त्या विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यातूनच आता या संपूर्ण गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खासगी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतात नापिकी व गावात पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाला टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. भविष्यात तुकाई चारी किंवा सिंचन योजनेच्या माध्यमातून गावाजवळील तलावात कुकडीचे पाणी सोडल्यास गावाच्या पाणी योजनेचा मोठा प्रश्न सुटेल. यासाठी भविष्यात तुकाई चारी प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.गावाच्या पाणी योजनेच्या जुन्या दोन व नवीन एक विहीर आटल्याने सध्या गावात पाणी टंचाई असल्याने २०० लिटर पाण्यासाठी ७० ते८० रूपये मोजावे लागत आहेत. -परशुराम हरी काळदाते, ग्रामस्थ, चिंचोली काळदात.पाणी टंचाईमुळे टँकरचा प्रस्ताव दाखल केला आहे. पाणी योजनेच्या विहिरीला आडवे बोअर घेऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - रघुआबा काळदाते, उपसरपंच, चिंचोली काळदात

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर