शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचे पाणवठे झाले कोरडे

By admin | Updated: March 1, 2016 23:32 IST

अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़

अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़ या पाणवठ्यांत मात्र, नियमित पाणी टाकण्यासाठी वनविभागाकडे स्वतंत्र निधीची तरतूद नाही़ तसेच या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, याबाबत उपवनसंरक्षक हेच अनभिज्ञ आहेत़ दुष्काळामुळे वनक्षेत्रातील जलसाठे आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी ससेहोलपट होत आहे. जंगलातील पशु-पक्ष्यांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम वनविभागाचे असले, तरी वनविभाग त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे़ पाण्यासाठी भटकंती करणारे हरणांचे कळप रस्त्यावर येऊन अपघातात मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत़ जिल्ह्यात बिबट्यांचे हल्लेही वाढले आहेत़ वनविभागाने जिल्ह्यात पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, नगर, कोपरगाव, जामखेड आदी तालुक्यांत मागील दोन वर्षांत ३९ पाणवठे तयार केले आहेत़ एक पाणवठा तयार करण्यासाठी ८० ते ९० हजार रुपयांची तरतूद आहे़ या पाणवठ्यांत पाणी टाकण्यासाठी मजूर कल्याण व आकस्मिक निधी वापरला जातो़ प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाण्यासाठी निधीची तरतूद झाली की नाही, सध्या किती पाणवठे भरले जातात, याची कुठलीही माहिती मुख्य कार्यालयात बसलेल्या उपवनसंरक्षकांना नाही़ तसेच तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही याबाबत कुठलाही अहवाल उपवनसरंक्षकांना पाठविलेला नाही़ वनक्षेत्र व तेथील वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी वनविभागाची असते़ प्रत्यक्षात मात्र, हा विभाग किती गांभीर्याने काम करतो, हे स्पष्ट होत आहे़ (प्रतिनिधी)वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत़ या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी विभागाकडे निधीची तरतूद नाही़ मजूर कल्याण व आकस्मिक निधी यासाठी वापरला जातो़ तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाणवठ्यांत पाणी टाकण्याची जबाबदारी आहे़ ते नियमित पाणी टाकतात की नाही, याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नसते़ तसेच याबाबत अहवाल पाठविला जात नाही़ -जी़ डी़ वळसे, उपवनसंरक्षक