शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वनविभागाचे पाणवठे झाले कोरडे

By admin | Updated: March 1, 2016 23:32 IST

अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़

अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़ या पाणवठ्यांत मात्र, नियमित पाणी टाकण्यासाठी वनविभागाकडे स्वतंत्र निधीची तरतूद नाही़ तसेच या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, याबाबत उपवनसंरक्षक हेच अनभिज्ञ आहेत़ दुष्काळामुळे वनक्षेत्रातील जलसाठे आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी ससेहोलपट होत आहे. जंगलातील पशु-पक्ष्यांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम वनविभागाचे असले, तरी वनविभाग त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे़ पाण्यासाठी भटकंती करणारे हरणांचे कळप रस्त्यावर येऊन अपघातात मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत़ जिल्ह्यात बिबट्यांचे हल्लेही वाढले आहेत़ वनविभागाने जिल्ह्यात पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, नगर, कोपरगाव, जामखेड आदी तालुक्यांत मागील दोन वर्षांत ३९ पाणवठे तयार केले आहेत़ एक पाणवठा तयार करण्यासाठी ८० ते ९० हजार रुपयांची तरतूद आहे़ या पाणवठ्यांत पाणी टाकण्यासाठी मजूर कल्याण व आकस्मिक निधी वापरला जातो़ प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाण्यासाठी निधीची तरतूद झाली की नाही, सध्या किती पाणवठे भरले जातात, याची कुठलीही माहिती मुख्य कार्यालयात बसलेल्या उपवनसंरक्षकांना नाही़ तसेच तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही याबाबत कुठलाही अहवाल उपवनसरंक्षकांना पाठविलेला नाही़ वनक्षेत्र व तेथील वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी वनविभागाची असते़ प्रत्यक्षात मात्र, हा विभाग किती गांभीर्याने काम करतो, हे स्पष्ट होत आहे़ (प्रतिनिधी)वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत़ या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी विभागाकडे निधीची तरतूद नाही़ मजूर कल्याण व आकस्मिक निधी यासाठी वापरला जातो़ तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाणवठ्यांत पाणी टाकण्याची जबाबदारी आहे़ ते नियमित पाणी टाकतात की नाही, याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नसते़ तसेच याबाबत अहवाल पाठविला जात नाही़ -जी़ डी़ वळसे, उपवनसंरक्षक