शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भंडारादरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ औरंगाबादच्या पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:26 IST

भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली.

राजूर : भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली.या बाबत येथील पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मयत सुभाष नलावडे (रा. गल्ली नंबर २, कैलास नगर, औरंगाबाद) हे आपली आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, भाचा यांच्या समवेत भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने आज भंडारदरा परिसरात पर्यटकांच्या गदीर्ला उधाण आले होते. भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलमधून गेल्या दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. हा फॉल पाहण्यासाठी हे कुटुंब तेथे आले होते. मयत नलावडे हे अँब्रेला फॉलच्या जवळ आले. येथे असलेल्या मोरीतून वेगाने पाणी बाहेर येत असते, या ठिकाणी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. खाली पडताच प्रवाहा बरोबर फॉलच्या खाली पडले. यात त्यांच्या डोक्यास मार लागल्याने ते जागीच मृत्यू पावले. घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी किशोर तळपे, प्रवीण थोरात घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी सांगितली. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले