शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

अन् डॉ. बाबासाहेब श्रीगोंद्यात थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:36 IST

भारतीय संविधानाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना आपले हक्क व अधिकार मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३२ मध्ये कर्जतहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या गाडीतील इंधन संपले. त्या

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : भारतीय संविधानाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना आपले हक्क व अधिकार मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३२ मध्ये कर्जतहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या गाडीतील इंधन संपले. त्यामुळे त्यांना काही काळ श्रीगोंद्यात थांबावे लागले होते. त्यांच्या पदस्पर्शाने जी जागा पावन झाली, त्या जागेवर उभारण्यात आलेले स्मारक आज डॉ. बाबासाहेबांच्या श्रीगोंदा भेटीच्या आठवणींना उजाळा देत आहे.देशाच्या विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक प्रबोधन व मानवमुक्तीचा लढा उभारला. त्यांच्या कार्याच्या अनेक आठवणी व प्रसंग आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरत आहेत.अशीच एक आठवण श्रीगोंद्यातून बाबासाहेबांनी केलेल्या प्रवासाचीही आहे. १९३२ मध्ये तेव्हा १३ ते १४ वर्षे वय असलेल्या दिनकर घोडके या मुलाने बाबासाहेब आंबेडकरांना श्रीगोंद्यातील सिद्धार्थनगर येथे थांबल्याचे पाहिले. त्याकाळी अज्ञान व शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या समाजातील जाणकार व वयोवृध्द लोक बाबासाहेबांच्या चरणांवर लोटांगण घेताना पाहिल्याचे घोडके हे आपल्या कुटुंबातील लोकांना वारंवार सांगत. घोडके कुटुंबीयांच्या आठवणीनुसार साधारण १९३२ च्या आसपास कर्जत येथील आपली नियोजित सभा आटपून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारने पुण्याच्या दिशेने चालले होते.श्रीगोंदा येथील सिद्धार्थनगर परिसराच्या आसपास जेथे भली मोठी वडांची झाडे होती. त्याच्या सावलीत बाबासाहेब गाडीचे इंधन संपले म्हणून थांबले होते. त्यावेळेस संबंध समाजात बाबासाहेब आल्याचे समजले. त्यामुळे त्यांना बघायला जमलेल्या समाजबांधवांना बाबासाहेबांनी, ‘मी काही देवमाणूस नाही. तुमच्यातीलच, तुमचा एक शिकलेला मुलगा आहे, माझ्या पायावर कशासाठी डोके ठेवता? पाया पडू नका. तुम्ही पुस्तके वाचा. मुलांना शाळा शिकवा. आपला परिसर स्वच्छ ठेवा’ असा संदेश दिला.श्रीगोंद्यातील व्यक्तीने आपल्या ट्रॅक्टरमधील इंधन काढून बाबासाहेबांच्या गाडीत भरले अन् बाबासाहेब पुण्याच्या दिशेने निघून गेले. त्यावेळस येथे आसपास पेट्रोल पंप नव्हता. या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार दिनकर घोडके यांचा त्यांच्या हयातीत अनेक सामाजिक संघटना व मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला आहे. दिनकर घोडके हे १८ एप्रिल २०१४ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.दीड कोटी रुपयांच्या स्मारकातून तरुणाईस प्रेरणाज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर थांबले होते, त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी व महापुरूषाचे स्मरण म्हणून एक एकर जागेत दीड कोटी रूपयांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. याच जागेत जिल्हा परिषदेची शाळाही आहे. दिवंगत दिनकर घोडके व काही सामाजिक संघटनांच्या मागणीनुसार व आंदोलनानंतर श्रीगोंदा नगरपालिकेने या स्मारकाची निर्मिती केली आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झालेल्या या जागेत हे भव्य स्मारक उभे राहिले आहे. या स्मारकात युवकांसाठी व्यायामशाळा, वाचनालय, ध्यान धारणा, धम्म मार्गदर्शन, भिखू संघ यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच मंगल परिणय व व्याख्यान देण्यासाठी प्रशस्त हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारे हे स्मारक तरूणाईला दिशादर्शक ठरणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा