शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे उत्पन्न दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाच्या आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला पिकांचे काढणीनंतरचे ...

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाच्या आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला पिकांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन या विषयावरील तीन आठवड्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी. जी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ए. के. सिंग यांनी मार्गदर्शन केले. सिंग म्हणाले, शेतकऱ्याच्या शेतावर तयार झालेला माल काही कारणास्तव बाजारात पोहोचेपर्यंत उशीर होतो. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालाचे काढणीपश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि विपणन याविषयी जागृती करण्याची गरज आहे. त्याचबरोबर फळे व भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पदार्थ उत्पादन करून त्यांची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्यासाठी वाव आहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू पाटील म्हणाले, प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थींनी कृषी उद्योजक होऊन, प्रक्रिया व विपणन या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. कार्यक्रमास आर. टी. पाटील, नचिकेत कोटवालीवाले, दिलीप पवार, डॉ. सुनील गोरंटीवार आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणाला संपूर्ण भारतातून ११४ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.