शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जिल्ह्यात दुचाकीवरून ‘डबलसीट’ला मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक ...

अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम राहणार आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. डबलसीट किंवा त्याहून अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे १४ दिवसांचा कडक लॉकाडाऊन करण्यात आला होता. त्याअनुषंगाने २१ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशालाच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर संचारबंदी कायम राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला आणि किराणा विक्री करता येणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत १० मेपर्यंत वेगळे नियम असल्याने नगर शहरात दूध विक्री वगळता सर्वच बंद राहणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवरून एकापेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वतंत्र आदेश जारी केला आहे. २ मेपासून ते १५ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. कोणत्याही संस्था, संघटना, व्यक्ती यांनी या आदेशाचे उल्लंघन करू नये. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी ही अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या सेवांना कडक निर्बंधातून सूट देण्यात आली होती, अशाच सेवांसाठी दुचाकीवरून एकापेक्षा जास्त जण प्रवास करीत असल्याचे दिसत होते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने हा नियम केला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-------

मार्केटयार्डमध्ये भाजीपाला, फळे विक्रीस मनाई

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मार्केट कमिटीच्या आवारात भाजीपाला, फळे विक्रीची सर्व दुकाने, तसेच इतर सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. हे निर्बंध १५ मेपर्यंत लागू राहणार आहेत. सदरची ही सर्व दुकाने नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात सुरू करण्यास परवानगी करण्यात आली आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन करण्यास फौजदारी कारवाईचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.