शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

जिल्ह्यात दुचाकीवरून ‘डबलसीट’ला मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक ...

अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम राहणार आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. डबलसीट किंवा त्याहून अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे १४ दिवसांचा कडक लॉकाडाऊन करण्यात आला होता. त्याअनुषंगाने २१ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशालाच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर संचारबंदी कायम राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला आणि किराणा विक्री करता येणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत १० मेपर्यंत वेगळे नियम असल्याने नगर शहरात दूध विक्री वगळता सर्वच बंद राहणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवरून एकापेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वतंत्र आदेश जारी केला आहे. २ मेपासून ते १५ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. कोणत्याही संस्था, संघटना, व्यक्ती यांनी या आदेशाचे उल्लंघन करू नये. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी ही अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या सेवांना कडक निर्बंधातून सूट देण्यात आली होती, अशाच सेवांसाठी दुचाकीवरून एकापेक्षा जास्त जण प्रवास करीत असल्याचे दिसत होते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने हा नियम केला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-------

मार्केटयार्डमध्ये भाजीपाला, फळे विक्रीस मनाई

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मार्केट कमिटीच्या आवारात भाजीपाला, फळे विक्रीची सर्व दुकाने, तसेच इतर सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. हे निर्बंध १५ मेपर्यंत लागू राहणार आहेत. सदरची ही सर्व दुकाने नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात सुरू करण्यास परवानगी करण्यात आली आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन करण्यास फौजदारी कारवाईचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.