शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘भूमी अभिलेख’ची दारे बंद

By admin | Updated: May 18, 2017 18:34 IST

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सरकारी कार्यालयातील सेवेची हमी जनतेला देण्यात आली.

आॅनलाईन लोकमतमिलिंदकुमार साळवे / अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सरकारी कार्यालयातील सेवेची हमी जनतेला देण्यात आली. पण याच अधिनियमानुसार मात्र राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सेवेची हमी गमावण्याची नामुष्की जनतेवर आली आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत या कार्यालयांमध्ये थेट कोणताही कागद घेऊन जाणाऱ्या जनतेला या अधिनियमाने या कार्यालयाची दारेच बंद केली आहेत.१ मे पासून अहमदनगर जिल्ह्यातील उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १ मे पासून भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये पूर्वीप्रमाणे थेट अर्ज व इतर कागदपत्रे नागरिकांना देता येत नाहीत. त्याऐवजी हे अर्ज व कागदपत्रे ‘आॅनलाईन’ देण्यास सांगण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणे नागरिक उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेखच्या कार्यालयांमध्ये अर्ज घेऊन गेल्यास त्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. असे अर्ज घेऊन येणारांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी माघारी पाठविले जात आहेत. त्यामुळे दूरच्या ग्रामीण भागातून या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच पैशासोबतच वेळसुद्धा वाया जात आहे. कार्यालयांमध्ये पूर्वीसारखे ‘बायहँड’ अर्जच स्वीकारले जात नसल्याने अघोषितपणे सर्वसामान्य जनतेस या कार्यालयांचे दारे लोकसेवा हक्क अधिनियमामुळे बंद झाली आहेत. त्यामुळे इकडून तिकडे अन् तिकडून इकडे चकरा माराव्या लागत आहेत.                                                      महसुलावर परिणाम१ मे पासून भूमी अभिलेख कार्यालयांचे कामकाज लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ‘आॅनलाईन’ केले आहेत. त्यानुसार आमच्या विभागाशी संबंधित २३ प्रकारच्या सेवा निर्धारित करून दिलेल्या आहेत. कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष अर्ज न स्वीकारता आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, त्याचा पाठपुरावा, उत्तर देणे अशी सर्व प्रक्रिया आता आॅनलाईन सुरू आहे. पूर्वी आमच्या कार्यालयात दहा रुपयांचे मुद्रांक शुल्क तिकीट लावून अर्ज करता येत होता. आता त्यासाठी नागरिकांना सायबर कॅफे किंवा सेतूमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. त्यात त्यांचा वेळ व पैसाही पूर्वीपेक्षा जास्त खर्च होत आहे. पूर्वी जिल्ह्यात जमीन मोजणीचे पाचशे ते सहाशे अर्ज येत होते. गेल्या १५ दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात असे २० ते २५ अर्जच आले आहेत. त्यामुळे आॅनलाईनच्या बदलामुळे खात्याच्या महसुलावरदेखील परिणाम झाला आहे. या बदलाच्या सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रियांबाबत शिफारशी सरकारला कळविण्यात येणार आहेत, असे भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक महेश शिंदे यांनी सांगितले़