शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:53 IST

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

येत्या रविवारपासून शहरात आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे.  त्याकरिता शुक्रवारी रिक्षाद्वारे व्यावसायीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी मात्र याधीच बंदला उघडपणे विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आमदार कानडे यांची भूमिका जाणून घेतली.

आमदार कानडे म्हणाले, केंद्र सरकारने घाईघाईत केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. विकासदर हा वजा चोवीसपर्यंत कोसळला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांची अर्थव्यवस्था मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन बंद करून सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. सरकारचा प्राधान्यक्रम हा गरीब माणसांचा मृत्यूदर कमी करण्याला आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ५० खाटांचे कोवीड केंद्र सुरू होत आहे.

नगरपालिकेने स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एसएमएस मंत्र दिला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी, नियमिपणे हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.-----------कोरोनासोबत जगावे लागेलकोरोनासोबत जीवन जगण्यासाठी समाजाला प्रवृत्त करावे लागेल. समाज हे हळूहळू शिकत आहे. गरीबांचा गेलेला रोजगार पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. काँग्रेस पक्ष देशभर रोजगार दो हे आंदोलन करत आहे. या अभियानात आपण स्वत: सहभागी आहोत. त्यामुळे पक्ष गरिबांचा विचार प्राधान्यक्रमाने करत आहे, असे आमदार कानडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर