शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:53 IST

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

येत्या रविवारपासून शहरात आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे.  त्याकरिता शुक्रवारी रिक्षाद्वारे व्यावसायीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी मात्र याधीच बंदला उघडपणे विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आमदार कानडे यांची भूमिका जाणून घेतली.

आमदार कानडे म्हणाले, केंद्र सरकारने घाईघाईत केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. विकासदर हा वजा चोवीसपर्यंत कोसळला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांची अर्थव्यवस्था मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन बंद करून सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. सरकारचा प्राधान्यक्रम हा गरीब माणसांचा मृत्यूदर कमी करण्याला आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ५० खाटांचे कोवीड केंद्र सुरू होत आहे.

नगरपालिकेने स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एसएमएस मंत्र दिला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी, नियमिपणे हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.-----------कोरोनासोबत जगावे लागेलकोरोनासोबत जीवन जगण्यासाठी समाजाला प्रवृत्त करावे लागेल. समाज हे हळूहळू शिकत आहे. गरीबांचा गेलेला रोजगार पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. काँग्रेस पक्ष देशभर रोजगार दो हे आंदोलन करत आहे. या अभियानात आपण स्वत: सहभागी आहोत. त्यामुळे पक्ष गरिबांचा विचार प्राधान्यक्रमाने करत आहे, असे आमदार कानडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर