शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अहमदनगर जिल्ह्यात भाजपला खरेच अध्यक्ष आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:47 IST

अहमदनगर : उत्तरेचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर शिर्डीत, तर दक्षिणेचे अध्यक्ष अरुण मुंडे हे शेवगावच्या बाहेर पडलेले नाहीत़. अहमदनगर शहराचे अध्यक्ष भैय्या गंधे हे तर घराच्या बाहेरही पडायला तयार नाहीत. आपला तालुका हीच ग्रामीण जिल्हाध्यक्षांची लक्ष्मण रेषा असल्याचे त्यांनी स्वत:च्या तालुक्यात ‘क्वारंटाईन’ करून घेत सिद्धच करून टाकले आहे.

अहमदनगर : भाजपाचे उत्तरेचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर शिर्डीत, तर दक्षिणेचे अध्यक्ष अरुण मुंडे हे शेवगावच्या बाहेर पडलेले नाहीत़. अहमदनगर शहराचे अध्यक्ष भैय्या गंधे हे तर घराच्या बाहेरही पडायला तयार नाहीत. आपला तालुका हीच ग्रामीण जिल्हाध्यक्षांची लक्ष्मण रेषा असल्याचे त्यांनी स्वत:च्या तालुक्यात ‘क्वारंटाईन’ करून घेत सिद्धच करून टाकले आहे.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड हे आजही तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून आहेत़ अन्नदान वाटपाच्या निमित्ताने शहराचे माजी अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी हेही संपर्कात आहेत. त्यांनीही तृतीयपंथियांना अन्नधान्याची मदत केली. परंतु, अन्य भाजपचे  पदाधिकारी व माजी मंत्री व विद्यमान अध्यक्ष एक चकार शब्दही काढताना दिसत नाहीत़. 

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे़ महामारीच्या संकटाने सामान्य माणूस भयभित झाला आहे़ हाताला रोजागार राहिलेला नाही़ सरकारी योजनांचा लाभ अनेकांना मिळालेला नाही़ शेतकरी हवालदिल झाला आहे़ जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे काम विरोधी पक्षाचे असते़ मात्र नगर जिल्ह्यात विरोधी पक्षच आहे की नाही, असा प्रश्न पडतो आहे. लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने धोका वाढला आहे़ पण, त्यावर बोलणार कोण? विरोधी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुठे गायब आहेत, ते सापडायला तयार नाहीत़ अध्यक्षपदे घेताना जसामान्यांचे कैवारी असल्याचा आव आणला जातो. पण लॉकडाऊनच्या काळातही हे दोन्ही अध्यक्ष आपआपल्या तालुक्याच्या बाहेर पडताना कुठेच दिसले नाहीत़ त्यात आता सर्वसाधने उपलब्ध असल्याने पक्ष वाढीसाठी किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दौºयांची गरज नाही़ घरबसल्या संवादही साधता येतो़ माजी जिल्हाध्यक्षांनी असा संवाद साधलाही़ पण विद्यमान अध्यक्षांनी मात्र मौन पाळले आहे. याचा अर्थ जिल्ह्यातील कोरोना आणि उपाययोजना योग्य पध्दतीनेच सुरू आहे, असाच काढायचा का़ मग इतरांनी तरी गळा का आणि कशासाठी काढावा, हाही प्रश्न आहेच़ 

---

अध्यक्षांचे नावेही आठवेनात

पूर्वी शहराला एक व ग्रामीणसाठी एक असे दोनच जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामातून त्यांची नावे संपूर्ण जिल्ह्याभरात चर्चेची होती. पक्षाने विक्रेंदीकरणाच्या नावाखाली एका जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. मात्र एकाचेही नाव कोणाला आठवत नसल्याचे चित्र आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण? असा भाजपच्या कार्यकर्त्याला जरी प्रश्न केला तरी त्याला आठवण्यासाठी वेळ द्यावा लागेल, अशी स्थिती सध्या भाजपात आहे.