आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने मिक्सोपॅथिच्याविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. नगर कल्याण रोडवरील आयएमए भवन येथे १४ फेब्रुवारीपर्यंत हे उपोषण सुरु ठेवण्यात येणार आहे.
या आंदोलनात आयएमएचे नगर शाखाध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, सीडब्ल्यूसी मेंबर डॉ. निसार शेख, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. सागर झावरे, डॉ. सतीष सोनवणे, खजिनदार डॉ. गणेश बडे, सह सचिव डॉ. अशोक नरवडे, डॉ. रामदास बांगर, डॉ. अमित कराडे, तसेच डॉ. राहुल पंडित, डॉ. पंकज मते, डॉ. कल्याणी चौधरी, डॉ. आसाराम भालसिंग, डॉ. मुग्धा तन्वर आदी सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे म्हणाले, जगभरात अनेक ठिकाणी भारतीय डॉक्टर्स त्यांच्या निष्णांत सेवेमुळे नावाजले गेले आहेत. कुठल्याही देशातील जनतेचे आरोग्य हे तेथील चांगल्या आरोग्य सेवेवर अवलंबून असते. आज आपल्या देशामध्ये ९६ टक्के जनतेचा आधुनिक वैद्यक शास्त्रातील उपचार घेण्याकडे कल आहे. याचे कारण म्हणजे सततचे संशोधन व अद्यावत तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले आहे. नूतन शैक्षणिक धोरण आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स् या संस्थेने २० नोव्हेंबर २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या सर्व उपचार पद्धती एकत्रित करुन आरोग्य सेवेची खिचडी करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचा ठाम विरोध आहे. यावेळी डॉ.अनिल आठरे यानी मनोगत व्यक्त केले.
१० उपोषण
ओळी-केंद्र सरकारने आरोग्य सेवेच्या संदर्भातील मिक्सोपॅथी थांबवावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणात सहभागी झालेले डॉक्टर.