शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

सात दिवसांत करा काम, नाही तर चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

करंजी : कल्याण-निर्मळ महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे दररोज अपघात होत आहेत. रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात ...

करंजी : कल्याण-निर्मळ महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे दररोज अपघात होत आहेत. रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. आता सात दिवसांत काम करा, नाही तर चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा शिवसेना व संतप्त नागरिकांनी दिला आहे.

कल्याण-निर्मळ महामार्ग क्र. ६१ या महामार्गाचे काम तब्बल ३ वर्षांपासून रखडले आहे. नगर-पाथर्डी या रस्त्यावरील करंजी ते कौडगाव (ता. नगर) या १२ कि.मी. अंतरात दररोज अपघात होऊन अनेकांचे बळी गेले, तर अनेकांना अपंगत्व आले. करंजी (ता. पाथर्डी) बसस्थानकापासून घाटापर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये माती आणून टाकल्याने धुळीचे लोट उडत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांना अस्थमा, ॲलर्जी, आदी आजाराने त्रस्त केले आहे. या महामार्गाच्या कामासाठी वर्षाला ठेकेदार बदलूनही काम झाले नाही.

सोमवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता करंजी बसस्थानकावर रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख, स्वप्निल मुखेकर, शिरीष मुखेकर, सुनील पवार, अनंत सुनील अकोलकर, आझाद पठाण, अल्ताफ पठाण, लाला रंगनाथ खोसे, अशोक अकोलकर, शफिक शेख, भारत मोरे, विजय शिंदे, नितीन गाडेकर, अशोक काळे, बाळासाहेब साखरे, आदींनी दिला आहे.

........

नगर-पाथर्डी या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यामुळे शेकडो प्रवाशांचे बळी गेले आहेत, तर अनेकांना अपंगत्व आहे आहे. आता सात दिवसांत काम करा, नाही तर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

-रफिक शेख, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना