शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

मद्याकडेच पाहू नका; रोजगारही महत्वाचा

By admin | Updated: April 22, 2016 00:16 IST

अहमदनगर : दारु निर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल,

अहमदनगर : दारु निर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे टाळले़ महसूलमंत्री खडसे गुरुवारी नगर दौऱ्यावर आले होते़ शासकीय विश्रामगृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ मद्यासाठी पाणी देण्याबाबत पत्रकारांनी छेडले असता खडसे यांनी वरील भूमिका मांडली़ केवळ एक बाजू पाहून निर्णय घेता येणार नाही, तर त्यासाठी सर्व बाजंूनी विचार होणे गरजेचे आहे़ मद्यनिर्मितीबरोबरच तेथील रोजगारही महत्वाचा असतो. त्यामुळे सर्व बाजूनी विचार करून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी द्यायचे किंवा नाही, याबाबत सरकार निर्णय घेईल,असे सांगून खडसे यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले़ मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे़ कुठेही पाणी कमी पडणार नाही़ वाट्टेल ते करू, प्रत्येकाला पाणी मिळेल याची सरकार व्यवस्था करेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत़ हा धागा पकडून खडसे यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वापरलेल्या पाण्याकडे अंगुली निर्देश केला़ ते म्हणाले लातूर येथील विलासराव देशमुख यांच्या कारखान्याने मांजरा धरणातील पाणी वापरले़ ते पाणी कारखान्याने वापरले नसते, तर लातूर शहरावर जलसंकटच ओढावले नसते, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़सेल्फीचे खडसे यांच्याकडून समर्थनग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत: चा फोटो काढण्यासाठी सेल्फी काढला नाही तर काम केल्याचा आनंद त्यांना झाला़ त्यामुळे त्यांनी तो सेल्फी काढला़ त्यात काही गैर नाही, असे मला वाटते़ विरोधकांकडे मुद्दा नाही़ त्यामुळे ते कोणत्या न कोणत्या मुद्यावरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला़ आता मोटारीनेच दौराहेलिपॅडसाठी ५ ते १० हजार लीटर पाणी वाया जाते़ ते वाया जाणार नाही, यासाठी यापुढे मोटारीनेच नव्हे तर पायीसुध्दा दौरे करण्याची आमची तयारी असल्याचे सांगून, मीडियाच आमचे अजेंडे ठरवित असल्याची कोटी त्यांनी यावेळी केली़