शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

५७ वर्षीय दिव्यांगांने सर केले कळसुबाई शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST

घारगाव : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावरगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मत:च दिव्यांग असून ते संगमनेर तालुक्यातील घारगाव ...

घारगाव : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावरगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मत:च दिव्यांग असून ते संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी सर्वोच्च कळसुबाई शिखर नुकतेच सर केले.दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५ हजार ४०० फूट प्रवास करीत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.

माधव सोनवणे यांचा विवाह सिंधुबाई मोरे यांच्याशी १९८९ साली झाला. सिंधुबाई या डोळस असूनही त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीला आधार देत आपला संसार थाटला. त्या शासकीय आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतात. या दाम्पत्याला तीन मुले असून हे सर्वजण उच्चशिक्षित आहेत. यातील दोघे अभियंते तर एक जण फायन्सास कंपनीत नोकरीला आहे. कळसुबाई शिखर सर करण्याची वडिलांची इच्छा या मुलांनी पूर्ण केल्याने आणि कळसुबाई शिखर सर केल्याने माधव सोनवणे हे आपले जीवन सार्थक झाल्याचे सांगतात.

सोमवारी (दि. ७) सकाळी नऊ वाजता सोनवणे यांचा शिखर सर करण्याचा प्रवास सुरू झाला. पत्नी सिंधुबाई, मुले प्रथमेश, ऋषिकेश,अविनाश यांच्या मदतीने ते मुख्य वाटेला लागले. पुणे, नाशिक येथील बरेच पर्यटक तिथे आले होते. सोनवणे हे एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडी मार्गापर्यंत पोहोचले. तोल सावरत, कधी मुलांचा हात पकडत त्यांनी शिखर सर केले. वाटेत भेटलेल्या प्रत्येकांने त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छाही दिल्या.

...........

चार वाजता परतीचा प्रवास

१३५० मीटर अंतर पार केल्यानंतर ते एका झाडाखाली विसावले. तिथे पाणी पिल्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांनी १६४० मीटर उंचीचे ( ५ हजार ४०० फूट) उंचीचे शिखर सर केले. परतीचा प्रवासही तसाच झाला. दुपारी साडेचार वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. सायंकाळी आठ वाजता ते शिखरावरून खाली उतरले. कळसूमातेच्या दर्शनाची आस व जिद्दीने शिखर सर केल्याचा सोनवणे यांना आनंद झाला. हे शिखर सर करताना आपण दिव्यांग आहोत, हे विसरून गेल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

----------

फोटो नेम : ११ माधव सोनवणे

ओळ : दिव्यांग असलेल्या माधव पंढरीनाथ सोनवणे यांनी कळसुबाई शिखर सर केले.