शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लॉकडाऊनपेक्षा खबरदारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST

अहमदनगर : जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येणारे शंभर दिवस कसोटीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्याबाबत ...

अहमदनगर : जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येणारे शंभर दिवस कसोटीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्याबाबत पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, मार्केट आणि गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सहा हजार रुग्ण सक्रिय राहण्याची शक्यता असून, त्यातील निम्म्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच भरती करावे लागणार आहे, अशी भीती पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केली. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊनपेक्षा खबरदारी घेण्यावरच प्रशासनाचा भर राहणार असल्याचे मुश्रिफ यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, भारतीय आयुर्वेद संस्थेचे संसर्गजन्य आजार निदान विभागाचे प्रमुख डॉ.रमण गंगाखेडकर यांनी येत्या महिनाभरात देशात किती रुग्ण वाढू शकतात, याचा अंदाज तयार केला आहे. कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशातील संभाव्य रुग्णवाढीच्या संख्येशी जिल्ह्याचे प्रमाण पाहता, एप्रिल महिन्याअखेर ६ हजार ३७० रुग्ण हे कोरोना बाधित होतील. त्यातील ५० टक्के रुग्णांना म्हणजे ३ हजार १८३ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करावे लागणार आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात २ हजार २६६ इतके बेड सज्ज आहेत. याशिवाय शिर्डी, राहुरी आदी ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी १५ टक्के (९५६) रुग्णांना ऑक्सिजनची, तर २ टक्के (२७४) रुग्णांना व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी लागणार आहे.

सध्या लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. गृहविलगीकरणाची परवानगी दिली, तर ते नियम पाळत नाहीत. त्यामुळे रुग्णांनी खासगी दवाखान्यात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल. जिल्हा रुग्णालयात स्वॅब दिल्यानंतर दोन दिवसांत अहवाल देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. महापालिकेतील आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी सध्या लसीकरण व कोरोना चाचणी करण्यात येते. आता त्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना मुश्रिफ यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

----

लोकांना ‘टचाटच’ लस द्यावी

वयाची अट काढून टाकत सरसकट नागरिकांना कोरोनावरील लस दिली पाहिजे. लोकांना ‘टचाटच’ लस दिली पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. बूस्टर डोससह लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कमी असून, इंजेक्शन उपलब्ध करणे आवश्यक आहे.

----------

शंभर दिवसांचे नियोजन- जिल्हाधिकारी

प्रशासनाने पुढील शंभर दिवसांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण ४७ कोविड सेंटर कार्यरत आहेत. ४ एप्रिलपर्यंत ६,३७० एवढी सक्रिय रुग्णांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून त्याचे पर्यायी नियोजन करण्यात येणार आहे. महापालिका चौकाचौकात फळे-भाजीपाला उपलब्ध करून देईल. नेप्ती उपबाजारामध्ये फळे-भाज्यांची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉटेल, रेस्टारंट आता आठ नंतर बंद राहणार आहेत. त्यामुळे त्यांची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. मंगल कार्यालयांमध्ये आता परवानगी घेतल्याशिवाय लग्न करता येणार नाही, तसेच तिथे ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल.

---------