शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जिल्ह्यात लॉकडाऊनपेक्षा खबरदारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST

अहमदनगर : जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येणारे शंभर दिवस कसोटीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्याबाबत ...

अहमदनगर : जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येणारे शंभर दिवस कसोटीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्याबाबत पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, मार्केट आणि गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सहा हजार रुग्ण सक्रिय राहण्याची शक्यता असून, त्यातील निम्म्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच भरती करावे लागणार आहे, अशी भीती पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केली. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊनपेक्षा खबरदारी घेण्यावरच प्रशासनाचा भर राहणार असल्याचे मुश्रिफ यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, भारतीय आयुर्वेद संस्थेचे संसर्गजन्य आजार निदान विभागाचे प्रमुख डॉ.रमण गंगाखेडकर यांनी येत्या महिनाभरात देशात किती रुग्ण वाढू शकतात, याचा अंदाज तयार केला आहे. कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशातील संभाव्य रुग्णवाढीच्या संख्येशी जिल्ह्याचे प्रमाण पाहता, एप्रिल महिन्याअखेर ६ हजार ३७० रुग्ण हे कोरोना बाधित होतील. त्यातील ५० टक्के रुग्णांना म्हणजे ३ हजार १८३ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करावे लागणार आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात २ हजार २६६ इतके बेड सज्ज आहेत. याशिवाय शिर्डी, राहुरी आदी ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी १५ टक्के (९५६) रुग्णांना ऑक्सिजनची, तर २ टक्के (२७४) रुग्णांना व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी लागणार आहे.

सध्या लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. गृहविलगीकरणाची परवानगी दिली, तर ते नियम पाळत नाहीत. त्यामुळे रुग्णांनी खासगी दवाखान्यात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल. जिल्हा रुग्णालयात स्वॅब दिल्यानंतर दोन दिवसांत अहवाल देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. महापालिकेतील आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी सध्या लसीकरण व कोरोना चाचणी करण्यात येते. आता त्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना मुश्रिफ यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

----

लोकांना ‘टचाटच’ लस द्यावी

वयाची अट काढून टाकत सरसकट नागरिकांना कोरोनावरील लस दिली पाहिजे. लोकांना ‘टचाटच’ लस दिली पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले. याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. बूस्टर डोससह लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कमी असून, इंजेक्शन उपलब्ध करणे आवश्यक आहे.

----------

शंभर दिवसांचे नियोजन- जिल्हाधिकारी

प्रशासनाने पुढील शंभर दिवसांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण ४७ कोविड सेंटर कार्यरत आहेत. ४ एप्रिलपर्यंत ६,३७० एवढी सक्रिय रुग्णांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून त्याचे पर्यायी नियोजन करण्यात येणार आहे. महापालिका चौकाचौकात फळे-भाजीपाला उपलब्ध करून देईल. नेप्ती उपबाजारामध्ये फळे-भाज्यांची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉटेल, रेस्टारंट आता आठ नंतर बंद राहणार आहेत. त्यामुळे त्यांची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. मंगल कार्यालयांमध्ये आता परवानगी घेतल्याशिवाय लग्न करता येणार नाही, तसेच तिथे ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल.

---------