शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जिल्हाभर धरणे

By admin | Updated: October 19, 2016 01:06 IST

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़ अकोले आणि पारनेर तालुक्यात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सरकारने मुस्लिमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा जमियत- उलमा ए हिंद संघटनेच्या वतीने यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़ मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले़ नगरमध्ये जमियत- उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष इर्शादउल्ला मकदुमी, व सचिव सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते़ सकाळी ११ वाजता समाज बांधवांनी धरणे सुरू केले़ दरम्यान जिल्ह्यातील अकोले व पारनेर तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयांसमोर धरणे सुरू केले़ तहसीलदारांना निवेदन देऊन ५ टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली़ जिल्ह्यासह तालुका पातळीवर एकाच दिवशी आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला़ आघाडी सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा मिळावे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़भारतीय मुस्लीम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे़ मुस्लीम समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून, त्यामुळेच मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते़ तत्कालीन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा आदेश दिला होता़ नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण लागूही झाले़ न्यायालयाने मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण वैध ठरविले होते़ परंतु, यासंदर्भात सरकारने कोणतेही ठोस भूमिका घेतली नाही़ परिणामी मुस्लिमांचे आरक्षणही अधांतरीच राहिले़ भाजपा सरकार सत्तेवर येऊन बराच काळ लोटला़ परंतु, सरकारने याबाबत एकदाही भूमिका मांडली नाही़ सरकारात मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कमालीची उदासीनता असून, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे़ सरकार मुस्लिमांना आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक चालढकल करत असून, मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा़ मुस्लिमांच्या न्याय मागण्यांकडे सरकारने कानाडोळा करू नये, अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे़ मौलाना अन्वर नदवी, सय्यद खलील, नसीर शेख, निसार बागवान, हाजी शौकत तांबोळी, मुस्तफा खान, सय्यद वहाब, उबेद शेख आदींची यावेळी भाषणे झाली़