शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जिल्हाभर धरणे

By admin | Updated: October 19, 2016 01:06 IST

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़ अकोले आणि पारनेर तालुक्यात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सरकारने मुस्लिमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा जमियत- उलमा ए हिंद संघटनेच्या वतीने यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़ मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले़ नगरमध्ये जमियत- उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष इर्शादउल्ला मकदुमी, व सचिव सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते़ सकाळी ११ वाजता समाज बांधवांनी धरणे सुरू केले़ दरम्यान जिल्ह्यातील अकोले व पारनेर तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयांसमोर धरणे सुरू केले़ तहसीलदारांना निवेदन देऊन ५ टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली़ जिल्ह्यासह तालुका पातळीवर एकाच दिवशी आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला़ आघाडी सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा मिळावे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़भारतीय मुस्लीम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे़ मुस्लीम समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून, त्यामुळेच मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते़ तत्कालीन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा आदेश दिला होता़ नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण लागूही झाले़ न्यायालयाने मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण वैध ठरविले होते़ परंतु, यासंदर्भात सरकारने कोणतेही ठोस भूमिका घेतली नाही़ परिणामी मुस्लिमांचे आरक्षणही अधांतरीच राहिले़ भाजपा सरकार सत्तेवर येऊन बराच काळ लोटला़ परंतु, सरकारने याबाबत एकदाही भूमिका मांडली नाही़ सरकारात मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कमालीची उदासीनता असून, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे़ सरकार मुस्लिमांना आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक चालढकल करत असून, मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा़ मुस्लिमांच्या न्याय मागण्यांकडे सरकारने कानाडोळा करू नये, अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे़ मौलाना अन्वर नदवी, सय्यद खलील, नसीर शेख, निसार बागवान, हाजी शौकत तांबोळी, मुस्तफा खान, सय्यद वहाब, उबेद शेख आदींची यावेळी भाषणे झाली़