शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जिल्हाभर धरणे

By admin | Updated: October 19, 2016 01:06 IST

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़ अकोले आणि पारनेर तालुक्यात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सरकारने मुस्लिमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा जमियत- उलमा ए हिंद संघटनेच्या वतीने यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़ मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले़ नगरमध्ये जमियत- उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष इर्शादउल्ला मकदुमी, व सचिव सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते़ सकाळी ११ वाजता समाज बांधवांनी धरणे सुरू केले़ दरम्यान जिल्ह्यातील अकोले व पारनेर तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयांसमोर धरणे सुरू केले़ तहसीलदारांना निवेदन देऊन ५ टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली़ जिल्ह्यासह तालुका पातळीवर एकाच दिवशी आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला़ आघाडी सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा मिळावे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़भारतीय मुस्लीम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे़ मुस्लीम समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून, त्यामुळेच मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते़ तत्कालीन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा आदेश दिला होता़ नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण लागूही झाले़ न्यायालयाने मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण वैध ठरविले होते़ परंतु, यासंदर्भात सरकारने कोणतेही ठोस भूमिका घेतली नाही़ परिणामी मुस्लिमांचे आरक्षणही अधांतरीच राहिले़ भाजपा सरकार सत्तेवर येऊन बराच काळ लोटला़ परंतु, सरकारने याबाबत एकदाही भूमिका मांडली नाही़ सरकारात मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कमालीची उदासीनता असून, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे़ सरकार मुस्लिमांना आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक चालढकल करत असून, मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा़ मुस्लिमांच्या न्याय मागण्यांकडे सरकारने कानाडोळा करू नये, अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे़ मौलाना अन्वर नदवी, सय्यद खलील, नसीर शेख, निसार बागवान, हाजी शौकत तांबोळी, मुस्तफा खान, सय्यद वहाब, उबेद शेख आदींची यावेळी भाषणे झाली़