शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सहकारी बँकेतील नोकर भरती घोटाळा : अण्णा म्हणाले, ‘पुरावे पाहून बोलता येईल’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:47 IST

प्रारंभी अण्णा हजारे यांनी लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता ‘पुरावे पाहून बोलता येईल’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. फेरचौकशीबाबतचे आक्षेप ‘लोकमत’ने यापूर्वीच माहिती अधिकाराचा वापर करत पुराव्यांसह समोर आणलेले आहेत. 

सुधीर लंके 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणी काही पुरावे आपणासमोर आले होते. त्याआधारे आपण शासनाकडे तक्रार केली होती. परंतु या प्रकरणाची सद्यस्थिती आपणाला माहीत नसून माहितीची कागदपत्रे व पुरावे मिळाल्यावर याबाबत बोलता येईल, अशी प्रतिक्रिया भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी या बँक भरती घोटाळ्याबाबत आता दिली आहे. 

जिल्हा बँकेत २०१७ साली राबविलेल्या ४६४ जागांच्या भरतीत अनियमितता असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. या प्रकरणी हजारे यांनी देखील २८ आॅक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या भरतीच्या लेखी परीक्षेबाबत गंभीर तक्रारी असून ही परीक्षा पुन्हा घ्या, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली होती. त्यानंतर सहकार विभागाने केलेल्या चौकशीत भरतीच्या उत्तरपत्रिकांतच फेरफार केल्याचे आढळल्याने भरती रद्द करण्यात आली. 

मात्र, काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने भरतीच्या चौकशीत आक्षेपित ठरलेल्या ६४ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका अधिकृत फॉरेन्सिक एजन्सीमार्फत तपासण्याचा आदेश दिला. त्यावर सहकार विभागाने या उत्तरपत्रिकांची तपासणी एका खासगी एजन्सीमार्फत केली. या एजन्सीने उत्तरपत्रिकांतील शाईमध्ये जी तफावत आढळली होती त्याबाबत काहीही भाष्य न करता उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत उत्तरे गोल कशी केली आहेत त्याआधारे अहवाल दिला.

हा अहवाल ग्राह्य मानत लगेचच सहकार विभागाने संपूर्ण भरती पुन्हा वैध ठरवली. फेरचौकशीत सहकार विभागाने संशयास्पद उत्तरपत्रिका सरकारी एजन्सीऐवजी खासगी एजन्सीकडून का तपासल्या व उत्तरपत्रिकांतील शाईची तफावत का तपासली नाही? या बाबी संशयास्पद आहेत.

याबाबत सहकार आयुक्त कार्यालय व सचिवांकडे लेखी तक्रारी झाल्या आहेत. मात्र, तक्रारी होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही आयुक्त अनिल कवडे यांनी त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. सहकार सचिव व सहकारमंत्री देखील मौन बाळगून आहेत. ‘लोकमत’ने गत १३ मे रोजी बँक भरतीच्या फेरचौकशीबाबत हजारे यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर १४ जुलैला त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. प्रारंभी हजारे यांनी लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता ‘पुरावे पाहून बोलता येईल’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. फेरचौकशीबाबतचे आक्षेप ‘लोकमत’ने यापूर्वीच माहिती अधिकाराचा वापर करत पुराव्यांसह समोर आणलेले आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक