शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

जिल्हा सहकारी बँकेतील नोकर भरती घोटाळा : अण्णा म्हणाले, ‘पुरावे पाहून बोलता येईल’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:47 IST

प्रारंभी अण्णा हजारे यांनी लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता ‘पुरावे पाहून बोलता येईल’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. फेरचौकशीबाबतचे आक्षेप ‘लोकमत’ने यापूर्वीच माहिती अधिकाराचा वापर करत पुराव्यांसह समोर आणलेले आहेत. 

सुधीर लंके 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणी काही पुरावे आपणासमोर आले होते. त्याआधारे आपण शासनाकडे तक्रार केली होती. परंतु या प्रकरणाची सद्यस्थिती आपणाला माहीत नसून माहितीची कागदपत्रे व पुरावे मिळाल्यावर याबाबत बोलता येईल, अशी प्रतिक्रिया भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी या बँक भरती घोटाळ्याबाबत आता दिली आहे. 

जिल्हा बँकेत २०१७ साली राबविलेल्या ४६४ जागांच्या भरतीत अनियमितता असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. या प्रकरणी हजारे यांनी देखील २८ आॅक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या भरतीच्या लेखी परीक्षेबाबत गंभीर तक्रारी असून ही परीक्षा पुन्हा घ्या, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली होती. त्यानंतर सहकार विभागाने केलेल्या चौकशीत भरतीच्या उत्तरपत्रिकांतच फेरफार केल्याचे आढळल्याने भरती रद्द करण्यात आली. 

मात्र, काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने भरतीच्या चौकशीत आक्षेपित ठरलेल्या ६४ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका अधिकृत फॉरेन्सिक एजन्सीमार्फत तपासण्याचा आदेश दिला. त्यावर सहकार विभागाने या उत्तरपत्रिकांची तपासणी एका खासगी एजन्सीमार्फत केली. या एजन्सीने उत्तरपत्रिकांतील शाईमध्ये जी तफावत आढळली होती त्याबाबत काहीही भाष्य न करता उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत उत्तरे गोल कशी केली आहेत त्याआधारे अहवाल दिला.

हा अहवाल ग्राह्य मानत लगेचच सहकार विभागाने संपूर्ण भरती पुन्हा वैध ठरवली. फेरचौकशीत सहकार विभागाने संशयास्पद उत्तरपत्रिका सरकारी एजन्सीऐवजी खासगी एजन्सीकडून का तपासल्या व उत्तरपत्रिकांतील शाईची तफावत का तपासली नाही? या बाबी संशयास्पद आहेत.

याबाबत सहकार आयुक्त कार्यालय व सचिवांकडे लेखी तक्रारी झाल्या आहेत. मात्र, तक्रारी होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही आयुक्त अनिल कवडे यांनी त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. सहकार सचिव व सहकारमंत्री देखील मौन बाळगून आहेत. ‘लोकमत’ने गत १३ मे रोजी बँक भरतीच्या फेरचौकशीबाबत हजारे यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर १४ जुलैला त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. प्रारंभी हजारे यांनी लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता ‘पुरावे पाहून बोलता येईल’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. फेरचौकशीबाबतचे आक्षेप ‘लोकमत’ने यापूर्वीच माहिती अधिकाराचा वापर करत पुराव्यांसह समोर आणलेले आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक