शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जिल्हा बँकेमुळेच राहुरी कारखाना अडचणीत

By admin | Updated: October 19, 2023 11:46 IST

अहमदनगर: जिल्हा बँकेने राहुरी कारखान्याची उचल पात्रता नसताना २०११ साली या कारखान्यास ४४ कोटी रुपये कर्ज दिले.

अहमदनगर: जिल्हा बँकेने राहुरी कारखान्याची उचल पात्रता नसताना २०११ साली या कारखान्यास ४४ कोटी रुपये कर्ज दिले. एवढे कर्ज दिले असतानाही हा कारखाना मात्र सुधारला नाही. त्यामुळे हे कर्ज कसे दिले. या ४४ कोटींचे काय झाले? याबाबत जिल्हा बँक व कारखान्याचे व्यवस्थापन या दोघांचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कर्जबाजारीपणाच्या नावाखाली राहुरी व पारनेर कारखान्यांची सुरु झालेली विक्री प्रक्रिया सरकारने थांबवावी, अन्यथा याप्रश्नी आपण जनतेचा तीव्र लढा उभारणार आहोत, असा पवित्रा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी घेतला आहे. राहुरी, पारनेर व नगर कारखान्याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. राहुरी कारखाना अडचणीत येण्यास जिल्हा बँक व कारखान्याचे आजी-माजी संचालक मंडळ हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. जिल्हा बँकेने या कारखान्याला दिलेले ४४ कोटीचे कर्ज हेच मुळात नियमबाह्य होते. अशा प्रकारच्या कर्ज वितरणास बँकेचे प्रशासन व नाबार्डचा विरोध असताना बँकेच्या पदाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला. त्या कर्जाची थकबाकी आज साठ कोटींवर पोहोचली आहे. आता जिल्हा बँकच कारखान्याची विक्री करायला निघाली आहे. म्हणजे अगोदर नियमबाह्य कर्ज द्यायचे व नंतर ते फिटले नाही म्हणून कारखाने विकण्याचे धोरण घ्यायचे, असा हा व्यवहार आहे. त्यामुळे कारखान्याला दिलेल्या कर्जाचीच अगोदर चौकशी व्हावी, अशी मागणी कोळसे यांनी केली आहे. हा कारखाना बंद पडल्यास कामगार, शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. आजही कामगारांना पगार नाहीत. इतरांनी केलेल्या चुकांची शिक्षा कामगार, शेतकर्‍यांना कशासाठी? असा सवाल कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.