शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जिल्हा प्रशासन नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:23 IST

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : श्रीरामपुरात विजय सप्तपदी अभियानास प्रारंभ अहमदनगर : जिल्ह्यात ८६८ रस्ते, ३१६ पाणंद रस्ते, पाच हजार ...

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : श्रीरामपुरात विजय सप्तपदी अभियानास प्रारंभ

अहमदनगर : जिल्ह्यात ८६८ रस्ते, ३१६ पाणंद रस्ते, पाच हजार ७३० जमीन तुकडे तोडणी भंग प्रकरणे, जागेअभावी सात हजार ६७० बेघर, ३५० गावांत भूसंपादन कार्य प्रलंबित असून, विजय सप्तपदी अभियानातून जिल्हा प्रशासन ते प्राधान्याने सोडविणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतून येथील उत्सव मंगल कार्यालयात रविवारी सप्तपदी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी डाॅ. भोसले बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप नचित, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, प्रांताधिकारी दयानंद जगताप, गोविंद शिंदे, देवदत्त केकाण, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डाॅ. भोसले म्हणाले, महसूल प्रशासनात कार्यरत असताना ५० कायद्यांची सुधारणा झाली. परंतु, सुधारित कायद्यांची अंमलबजावणी झाली नाही तर काही उपयोग होणार नाही. कायदे कागदावरच राहतात. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे महसूल विजय सप्तपदी अभियानाद्वारे सात विभागांतील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.

प्रशासनाने समोचाराने विविध प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सर्वांनी अभियानात सहभागी होऊन प्रश्नांची सोडवणूक करावी. केवळ महसूल प्रशासनाचे प्रश्न म्हणून चालणार नाहीत, तर सर्वांना मिळून काम करावे लागेल. कायदे केवळ पुस्तकात राहून उपयोग होत नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वादाच्या रस्त्यावर जाऊन अडथळा दूर करावा. आपण स्वत: शेतकरी कुटुंबातील असून, अधिकारी झाल्यानंतर स्वतःच्या शेत रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे सोडविता आला नाही. मुलगा महसूलमध्ये अधिकारी असल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा वडिलांनी व्यक्त केली. परंतु, कार्यालयातील सहकारी संपत यांच्याशी वाद असल्याने अखेर सामोपचार करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.

याप्रसंगी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची भाषणे झाली. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आभार मानले. तहसीलदार स्वाती देवरे यांनी अभियान गीत सादर केले.