शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात युरियाच्या राखीव साठा वितरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा राखीव साठा वितरणास सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे तसेच या आठवड्यात दोन कंपन्यांकडून कृषी सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होणार असल्यामुळे टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

तालुक्याच्या सर्वच मंडळांमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली होती. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे ऊस बांधणीसाठी खतांची मागणी असते तसेच बाजरी आणि मक्यासह अन्य चारा पिकांसाठी युरियासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. कृषी सेवा केंद्रांमधून युरिया गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.

आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगावसह तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी भीमा नदी पट्ट्यामध्ये युरियाची शोधाशोध करत होता. मिळेल तेथून युरिया आणण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत होती. तीव्र टंचाईमुळे युरियाबरोबर अन्य खतांची सक्ती शेतकऱ्यांना केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे वाढल्या होत्या. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून युरियाचा २५९ मे. टन राखीव साठा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

---

शेतकऱ्यांनी युरिया साक्षर व्हावे. राखीव साठा वितरणास सुरुवात झाली असली तरीही युरियाचा योग्य प्रमाणातच वापर करावा. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे नत्र स्थिरीकरण होत आहे. एकदाच मुबलक खते दिल्यास पिकांची कायिक वाढ होऊन किडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे दोन-तीन टप्प्यांत रासायनिक खते देण्याची गरज असते. युरियाचे वितरण कृषी सहायकांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे.

-पद्मनाभ म्हस्के,

तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा