शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

श्रीगोंदा तालुक्यात युरियाच्या राखीव साठा वितरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा राखीव साठा वितरणास सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे तसेच या आठवड्यात दोन कंपन्यांकडून कृषी सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होणार असल्यामुळे टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

तालुक्याच्या सर्वच मंडळांमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली होती. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे ऊस बांधणीसाठी खतांची मागणी असते तसेच बाजरी आणि मक्यासह अन्य चारा पिकांसाठी युरियासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. कृषी सेवा केंद्रांमधून युरिया गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.

आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगावसह तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी भीमा नदी पट्ट्यामध्ये युरियाची शोधाशोध करत होता. मिळेल तेथून युरिया आणण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत होती. तीव्र टंचाईमुळे युरियाबरोबर अन्य खतांची सक्ती शेतकऱ्यांना केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे वाढल्या होत्या. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून युरियाचा २५९ मे. टन राखीव साठा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

---

शेतकऱ्यांनी युरिया साक्षर व्हावे. राखीव साठा वितरणास सुरुवात झाली असली तरीही युरियाचा योग्य प्रमाणातच वापर करावा. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे नत्र स्थिरीकरण होत आहे. एकदाच मुबलक खते दिल्यास पिकांची कायिक वाढ होऊन किडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे दोन-तीन टप्प्यांत रासायनिक खते देण्याची गरज असते. युरियाचे वितरण कृषी सहायकांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे.

-पद्मनाभ म्हस्के,

तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा