शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दीडशे विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

धामणगाव आवारी : धामणगाव आवारी जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षिका रोहिणी खतोडे यांनी शनिवारी शाळेतील तब्बल दीडशे विद्यार्थ्यांना स्वखर्चातून ...

धामणगाव आवारी : धामणगाव आवारी जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षिका रोहिणी खतोडे यांनी शनिवारी शाळेतील तब्बल दीडशे विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मास्कचे वाटप करत कोरोना जागृतीचा संदेश दिला. सरपंच पूनम आवारी यांच्या हस्ते या मास्कचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळी उपसरपंच गणेश पापळ, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव देशमुख, मुख्याध्यापक भाऊसाहेब इरनक, मधुकर नवले आदी उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला.

विद्यार्थ्यांनी आपले हात नियमित स्वच्छ ठेवावे, सॅनिटाईझ करावे, मास्क लावण्याबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे आणि आपल्या घरीही हा संदेश द्यावा, असे आवाहन यावेळी सरपंच पूनम आवारी यांनी केले.

शिक्षिका रोहिणी खतोडे यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव पापळ, उपाध्यक्ष देवदत्त नवले यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब इरनक यांनी केले. स्वागत दत्तात्रय लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन बाळू खाडे यांनी केले तर स्वाती अडाणे यांनी आभार मानले. यावेळी विक्रम गायकर, बाळासाहेब तोरमड, भारती काळे, सुनीता आंबरे आदी शिक्षक उपस्थित होते.