शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास शिक्षण विभागाची टाळाटाळ; नगर जिल्ह्यात शिक्षकांमध्ये नाराजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 19:36 IST

अहमदनगर जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे.

अहमदनगर: जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे. पुढील दोन दिवसांत समायोजन करून अहवाल ग्रामविकास कार्यालयास सादर केला जाणार आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा आदेश दिला आहे. जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश दिला आहे. परंतु, जिल्हा परिषदेने समायोजनाची प्रक्रिया अद्याप सुरूच केलेली नाही. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाचे सचिव प्रि. श. कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत येत्या दोन दिवसांत समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण केली जाणार आहे. मात्र समायोजनाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून संच मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया खोळंबली असल्याने ग्रामविकास खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या, मंजूर शिक्षकांची पदे, अतिरिक्त शिक्षक,यासारखी माहिती आॅनलाईन भरणे बंधनकारक होते. मात्र शिक्षकांनी आॅनलाईन भरली नाही. त्यामुळे केंद्रप्रमुखांना माहिती उपलब्ध झाली नाही. परिणामी तालुक्यांच्या गटशिक्षण अधिका-यांना समायोजन करणे शक्य झाले नाही. जिल्ह्यातील १ जानेवारी २०१८ नुसार पटसंख्या संकेतस्थळावर भरणे आवश्यक असून, त्यानंतरच शिक्षण विभागाकडून संच मान्यता मिळणार आहे.

शिक्षण विभागाचे वाभाडे

शिक्षण विभागाच्या कारभारावर पदाधिका-यांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. मात्र दस्तुर खुद्द ग्राविकास खात्याच्या सचिवांनीच नाराजी व्यक्त केली आहे. आदेशाचीही अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून होत नसल्याने केंद्रप्रमुखांची दोन वेतनवाढी रोखण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील आवमेळ चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर