शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

कुकडीच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत,चाºया रिकाम्याच : कमी दाबाने पाणी सोडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:47 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कआढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. गेल्या महिनाभरापासून कर्जत आणि करमाळा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सुरु असताना श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरु झाले की पाण्याचा दाब कमी का होतो ? हा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शुक्रवार ( दि. १७ ) पासून श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला कुकडीचे आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी जाहीर केले. पहिल्या दिवशी चारी क्र. १४, १३ आणि १२ ला  टेल टू हेड पध्दतीने पाणी सुरु झाले. परंतु दुपारनंतर कुकडीच्या मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब कमी होऊन सोडलेल्या चाºया बंद झाल्या. तिन्ही चाºयांपैकी एकाही चारीचे पाणी टेल पर्यंत पोहोचले नाही. शनिवारी फक्त चारी क्र. १३ आणि १४ ला कमी दाबाने पाणी सोडले, मग नियोजनाचे काय ? असा सवाल शेतकरी करीत आहेत.कोरोनाच्या संकटामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना कुकडीच्या पाण्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उभी पिके आणि फळबागा धोक्यात आल्या आहेत. उन्हाळा वाढल्यामुळे सर्वांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. उन्हाळी पिकांसह फळबागांना पाणी आवश्यक असल्यामुळे आवर्तन सुरळीतपणे पार पडण्याची अपेक्षा  शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. --कोटकुकडीचे आवर्तन सुरळीतपणे पार पडणार असून सर्व शेतकºयांना पूर्ण दाबाने पाणी देणार आहे. भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. -स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता, सिंचन शाखा,श्रीगोंदा. ---

फोटो आढळगाव ( ता. श्रीगोंदा )  शिवारात कुकडी चारी क्र. १३ चे टिपलेले छायाचित्र. चारीमध्ये पाण्याची पातळी पाहूनच पाण्याचा दाब लक्षा