शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्यासाठी धोरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:29 IST

लोणी : मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा ...

लोणी : मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी लोणी बुद्रुक (ता.राहाता) येथे ६० कुटुंबीयांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आले. सिंधुताई आदिवासी निवारा असे नामकरण असलेल्या या गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात विखे बोलत होते.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी अध्यक्षा शालिनी विखे, जलजीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक डॉ. परिक्षित यादव, जिल्‍हा परिषदेचे उपमुख्‍य कार्यकारी आधिकारी भोर, सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे उपस्थित होते.

विखे म्हणाले, अतिशय संघर्षमय परिस्थितीत ही सर्व कुटंबे या जागेत राहत होती. त्यांना घरे मिळावीत अशी मातोश्री सिंधुताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे मोठे समाधान आहे. विविध शासकीय विभागांच्या जागा मोठ्या प्रमाणात पडीक असतात. परंतु त्याचा विनियोग होत नाही. वर्षानुवर्षे या जागांवर अतिक्रमणे राहिली आहेत. परंतु, सामाजिक दृष्टिकोनातून विचार झाल्यास या जागांचा उपयोग शासकीय घरकुल योजनांच्या उभारणीसाठी झाल्यास वंचित घटकांना हक्काचे घर मिळवून देता येईल.

या घरकुलांच्‍या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्‍या काळात घेण्‍यात आला. राज्‍यातील हा पहि‍ला निर्णय ठरला आहे.त्‍याच जागेवर घर रहिवाश्‍यांना घर देण्‍याचा गृह प्रकल्‍प यशस्‍वी होऊ शकला. भविष्‍यात ग्रामीण भागात अशा जागांसाठी निश्चित असे धोरण घेऊन जर घरकुल योजनांसाठी जागा उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय घेतला तर त्‍याचा निश्चितच लाभ वंचित घटकांना होईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, राज्‍यातील हा पहि‍ला प्रकल्‍प लोणीसारख्‍या गावामध्‍ये साकार झाला. विविध योजनांच्‍या माध्‍यमातून हा प्रकल्‍प पूर्ण झाल्‍याने रहिवाश्‍यांना हृक्काचे घर मिळाले. शालिनी विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या गृहप्रकल्पाच्या शासकीय स्तरावर झालेल्या पाठपुराव्याचा आढावा घेतला.