शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्यासाठी धोरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:29 IST

लोणी : मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा ...

लोणी : मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी लोणी बुद्रुक (ता.राहाता) येथे ६० कुटुंबीयांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आले. सिंधुताई आदिवासी निवारा असे नामकरण असलेल्या या गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात विखे बोलत होते.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी अध्यक्षा शालिनी विखे, जलजीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक डॉ. परिक्षित यादव, जिल्‍हा परिषदेचे उपमुख्‍य कार्यकारी आधिकारी भोर, सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे उपस्थित होते.

विखे म्हणाले, अतिशय संघर्षमय परिस्थितीत ही सर्व कुटंबे या जागेत राहत होती. त्यांना घरे मिळावीत अशी मातोश्री सिंधुताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे मोठे समाधान आहे. विविध शासकीय विभागांच्या जागा मोठ्या प्रमाणात पडीक असतात. परंतु त्याचा विनियोग होत नाही. वर्षानुवर्षे या जागांवर अतिक्रमणे राहिली आहेत. परंतु, सामाजिक दृष्टिकोनातून विचार झाल्यास या जागांचा उपयोग शासकीय घरकुल योजनांच्या उभारणीसाठी झाल्यास वंचित घटकांना हक्काचे घर मिळवून देता येईल.

या घरकुलांच्‍या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्‍या काळात घेण्‍यात आला. राज्‍यातील हा पहि‍ला निर्णय ठरला आहे.त्‍याच जागेवर घर रहिवाश्‍यांना घर देण्‍याचा गृह प्रकल्‍प यशस्‍वी होऊ शकला. भविष्‍यात ग्रामीण भागात अशा जागांसाठी निश्चित असे धोरण घेऊन जर घरकुल योजनांसाठी जागा उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय घेतला तर त्‍याचा निश्चितच लाभ वंचित घटकांना होईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, राज्‍यातील हा पहि‍ला प्रकल्‍प लोणीसारख्‍या गावामध्‍ये साकार झाला. विविध योजनांच्‍या माध्‍यमातून हा प्रकल्‍प पूर्ण झाल्‍याने रहिवाश्‍यांना हृक्काचे घर मिळाले. शालिनी विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या गृहप्रकल्पाच्या शासकीय स्तरावर झालेल्या पाठपुराव्याचा आढावा घेतला.