शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्यासाठी धोरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:29 IST

लोणी : मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा ...

लोणी : मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी लोणी बुद्रुक (ता.राहाता) येथे ६० कुटुंबीयांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आले. सिंधुताई आदिवासी निवारा असे नामकरण असलेल्या या गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात विखे बोलत होते.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी अध्यक्षा शालिनी विखे, जलजीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक डॉ. परिक्षित यादव, जिल्‍हा परिषदेचे उपमुख्‍य कार्यकारी आधिकारी भोर, सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे उपस्थित होते.

विखे म्हणाले, अतिशय संघर्षमय परिस्थितीत ही सर्व कुटंबे या जागेत राहत होती. त्यांना घरे मिळावीत अशी मातोश्री सिंधुताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे मोठे समाधान आहे. विविध शासकीय विभागांच्या जागा मोठ्या प्रमाणात पडीक असतात. परंतु त्याचा विनियोग होत नाही. वर्षानुवर्षे या जागांवर अतिक्रमणे राहिली आहेत. परंतु, सामाजिक दृष्टिकोनातून विचार झाल्यास या जागांचा उपयोग शासकीय घरकुल योजनांच्या उभारणीसाठी झाल्यास वंचित घटकांना हक्काचे घर मिळवून देता येईल.

या घरकुलांच्‍या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्‍या काळात घेण्‍यात आला. राज्‍यातील हा पहि‍ला निर्णय ठरला आहे.त्‍याच जागेवर घर रहिवाश्‍यांना घर देण्‍याचा गृह प्रकल्‍प यशस्‍वी होऊ शकला. भविष्‍यात ग्रामीण भागात अशा जागांसाठी निश्चित असे धोरण घेऊन जर घरकुल योजनांसाठी जागा उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय घेतला तर त्‍याचा निश्चितच लाभ वंचित घटकांना होईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, राज्‍यातील हा पहि‍ला प्रकल्‍प लोणीसारख्‍या गावामध्‍ये साकार झाला. विविध योजनांच्‍या माध्‍यमातून हा प्रकल्‍प पूर्ण झाल्‍याने रहिवाश्‍यांना हृक्काचे घर मिळाले. शालिनी विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या गृहप्रकल्पाच्या शासकीय स्तरावर झालेल्या पाठपुराव्याचा आढावा घेतला.