शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांत वाढले मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

अहमदनगर : कोरोना महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला. उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने बहुतांशी जणांचा रोजगार गेल्याने जनजीवन ढवळून निघाले. कोरोनाची ...

अहमदनगर : कोरोना महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला. उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने बहुतांशी जणांचा रोजगार गेल्याने जनजीवन ढवळून निघाले. कोरोनाची लाट शिथिल होताच भरीस भर रस्ते अपघातांतही दुर्दैवाने बहुतांशी जणांचा मृत्यू झाला. गेल्या दीड वर्षातील अपघातांची आकडेवारी पाहता मरण स्वस्त झाले की काय असे वाटू लागले आहे. मागील दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी १ हजार ८१९ अपघात झाले. यात ९१४ जणांचा मृत्यू झाला तर ८३८ जण जखमी झाल्याची वाहतूक विभागात नोंद आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षात बहुतांशीकाळ संचारबंदी होती. लॉकडाऊन काळात रस्त्यावर अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारीच वाहने होती. त्यामुळे या काळात अपघातांचे प्रमाण अपवादात्मक होते; मात्र मागील आणि यावर्षी अनलॉक होताच अपघातांचे प्रमाण वाढले अन् अनेकांना जीव गमवावा लागला. नगर जिल्ह्यातून सहा राज्य व एक राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते तसेच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

-----------------

ही आहेत अपघातांची कारणे

अतिवेगाने वाहन चालविणे

खराब रस्ते

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष

वळणाच्या ठिकाणी ओव्हरटेक करणे

दारु पिऊन वाहन चालविणे

तरुणांमध्ये सुसाट वाहने चालविण्याची क्रेझ

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे

--------------------

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे. पादचाऱ्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या शहरात सर्वाधिक जास्त घटना घडल्या आहेत.

----------------------

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

बाईक व कार सुसाट चालविण्याची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. हा प्रकार जिवघेणा ठरत आहे. तसेच वाहन चालविताना बहुतांशी तरुण मोबाईलवर बोलताना दिसतात. परिणामी अपघातातील मृतांमध्ये तरुणांची सर्वाधिक संख्या असल्याचे निदर्शनास येत आहे.

-----------------------

या ठिकाणी वाहने हळू चालवा

जिल्ह्यात नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाट, पांढरीपूल, मनमाड रोडवरील विळद बायपास, नगर-दौंड रस्त्यावरील विसापूर फाटा, पाथर्डी रोडवरील करंजी घाट, कोपरगाव परिसरातील झगडे फाटा, नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाट, नगर-साेलापूर महामार्ग, कल्याण महामार्ग आदी ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या ब्लॅक स्पॉटवर नियमातच वाहने चालविणे गरजेचे आहे.

----------------

वर्षे अपघात जखमी मृत्यू

२०१९ १६९१ ७९४ ८१९

२०२० १२२५ ५६३ ६११

२०२१ (मे पर्यंत) ६९६ २७५ ३०३