शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या आंदोलन केले सुरू
4
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
5
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
6
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
7
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
8
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
9
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
10
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
11
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
12
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
13
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
14
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
15
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
16
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
17
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
18
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
19
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
20
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला

पराक्रमाने नियतीला बदलता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:27 IST

प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे असते. परंतु जो संघर्ष करुन परिस्थितीवर मात करतो तो एक प्रकारचा पराक्रम समजला पाहिजे. म्हणून पराक्रमाने प्रत्येक जण नियतीला सुध्दा बदलू शकतो. धर्म आराधनेत असाच पराक्रम करा म्हणजे ध्येयपूर्तीकडे वाटचाल करता येते हेच महावीर कथेद्वारे स्पष्ट होते

सन्मतीवाणी

प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे असते. परंतु जो संघर्ष करुन परिस्थितीवर मात करतो तो एक प्रकारचा पराक्रम समजला पाहिजे. म्हणून पराक्रमाने प्रत्येक जण नियतीला सुध्दा बदलू शकतो. धर्म आराधनेत असाच पराक्रम करा म्हणजे ध्येयपूर्तीकडे वाटचाल करता येते हेच महावीर कथेद्वारे स्पष्ट होते. सत्पुरुष हे दयेचे सागर करुणाकर असतात ते वात्सल्य भावनेने सम्यकवृत्ती ठेवून सर्वांवर ममता करतात. सतपुरुषांची वाणी कधीही असत्य नसते. भाग्य हे नशीबाने बदलत नाही तर त्याकरीता चांगली कर्म करण्याची आवश्यकता असते. जी व्यक्ती चांगल्या कर्माने स्वत:चे भाग्य बदलते तीच पुरुषार्थ करणारी ठरते. महापुरुष आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्व प्राणी मात्रांचा उध्दार व्हावा, ते पापमुक्त व्हावेत या हेतूने करतात. गुरुच्या आचार विचारानुसार वागणे हे साधकाचे काम आहे. गुरुची परीक्षा साधकाला घेता येत नाही. गुरुचा कधीही अपमान करु नये. महापुरुषांच्या संगतीत जीवनाला नवीन दिशा प्राप्त होते. तीर्थकर बनण्याकरीता भगवान महावीरांनी किती यातना सहन केल्या, किती संकटांचा सामना केला याचे वर्णन महावीर कथेद्वारे कळते. गुरु हे आपले आधार असतात. अंतिम काळ चांगला जावा या करीता चांगले कर्म करा. धर्मसाधना करण्याचा प्रयत्न करावा. सदविचार करा, संत संगती करा, जीवन सफल होईल.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर