शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

सत्ता असूनही आमचे चालत नाही

By admin | Updated: April 25, 2016 23:19 IST

संगमनेर : भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.

संगमनेर : भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला. युती सरकारतर्फे सोमवारी आ. भोळे यांची एकस्तरीय समिती तालुक्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी आली होती. भोळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर टंचाई आढावा बैठक झाली. तहसीलदार शरद घोरपडे, पं. स. चे सहायक गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाई ऐवजी अधिकाऱ्यांकडून युतीच्या कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीवरच अधिक ऊहापोह झाला. तालुक्यातील अधिकारी काँग्रेस आमदाराच्या दबावाखाली कामे करतात. आपली सत्ता येऊनही आम्हाला विरोधक असल्यासारखे वाटते. परवानगी नसताना प्रवरा नदीतून वाळू उपसा सुरू आहे. ५२ कोटींची वाळू चोरी झाली अन् महसूलचे अधिकारी १३ कोटीची वसुली केल्याचे सांगतात, अशा गंभीर तक्रारी शहराध्यक्ष सांगळे यांनी केल्या. तळेगाव पाणी पुरवठा योजनेची कमिटी काँग्रेसची असल्याने अवास्तव निर्णय घेतले जातात. शुद्धीकरण केंद्र बंद असल्याने दूषित पाणी प्यावे लागते. या कमिटीची चौकशी करा, अशी मागणी शरद गोर्डे यांनी केली. पेमगिरीला कायमस्वरुपी तलाठी नाही, आम आदमी विमा योजनेचा लाभ नागरिकांना मिळत नाही, असे दिलीप कोल्हे यांनी म्हटले. बैठकीत नियोजनाचा अभाव असल्याने गोंधळ उडाला. याप्रसंगी जि. प. पाणी पुरवठ्याचे उपअभियंता ए. एच. तडवी, महावितरणचे हेमंतकुमार चौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, दादा गुंजाळ, रंगनाथ फटांगरे, शाम कासार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)