शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर मुख्यमंत्र्यांच्या दारी

By admin | Updated: October 26, 2016 00:52 IST

अहमदनगर : शहराच्या पाणी पुरवठा फेज टू योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला,

अहमदनगर : शहराच्या पाणी पुरवठा फेज टू योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला, तर उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवून अमृत योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी फेरनिविदा काढण्याची गळ घातली.शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेमधील अडथळे दूर करण्यासाठी महापौर सुरेखा कदम याच रस्त्यावर उतरल्या. जलवाहिनी टाकण्यासाठी ज्यांच्या शेतामध्ये अडथळे आले होते, त्या शेतकऱ्यांशी महापौरांनी चर्चा केली. अडथळे दूर झाल्यास तीन महिन्यांमध्ये जलवाहिन्या टाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत ठेकेदारालाही बजावण्यात आले आहे.शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या फेज टू योजनेतील अडथळे असलेल्या ठिकाणांची महापौर सुरेखा कदम यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. त्यांच्यासमवेत आयुक्त दिलीप गावडे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, नगरसेवक अनिल बोरुडे, महेश तवले यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, सुरेश तिवारी, संपत नलावडे, शरद ठाणगे, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते. अभियंता परिमल निकम, महादेव काकडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.अमृत योजनेसाठी निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर सर्वांत कमी वाढीव दराची निविदा मे. तापी प्रिस्टेस प्रा. लि. यांची असल्याने त्यांनाच काम देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र या ठेकेदार कंपनीने ‘फेज टू’ योजनेचे वाटोळे केले असल्याने त्यांना काळ््या यादीत टाकून अमृत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दिवाळी झाल्यानंतर अमृत योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे छिंदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.केंद्र-राज्य शासनाच्या निधीमधून अमृत या महत्त्वांकाक्षी योजनेमधून शहराच्या पाणीपुरवठा विषयक कामांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ‘फेज टू’ योजनेचे वाटोळे करणाऱ्या मे. तापी या कंपनीनेच अमृतसाठी सर्वांत कमी वाढीव दराची निविदा दाखल केली. त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय मुद्द्यावर याच ठेकेदार कंपनीला काम देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र कंपनीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन काम देण्याबाबत निविदेत शब्द नमूद करण्यात आलेला आहे. ‘फेज टू’चा पूर्वानुभव लक्षात घेता या कंपनीला अमृतचे काम देऊ नये. राबविण्यात येत असलेली निविदाप्रक्रिया रद्द करावी, आणि फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी छिंदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निविदाप्रक्रिया रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे छिंदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुळानगर येथील नवीन पंप बसविणे, जलवाहिनी टाकण्यासाठी येणारे अडथळे याबाबत महापौरांनी मुळानगर ते विळद पंपिंग स्टेशन ते शहराकडे येणाऱ्या शेतामध्ये जलवाहिन्या टाकण्याबाबत असलेल्या आक्षेपांबाबत संबंधित शेतकरी, जमीनमालकांशी चर्चा केली. जलवाहिनी टाकण्याबाबतच्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाजूंबाबत ठेकेदार अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. जलवाहिन्या अंथरण्याबाबतचे अडथळे दूर केल्यास तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांनी संमती दर्शविली असे, महापौर कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.