शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उपमुख्यमंत्र्यांनी टीका करण्यापेक्षा मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीत - बाळासाहेब थोरात

By शेखर पानसरे | Updated: December 18, 2022 10:21 IST

महाविकास आघाडीचा महामोर्चा ; टीका-प्रतिटीका

संगमनेर : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चाला प्रचंड गर्दी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चावर जी काही टीकाटिपण्णी केली. त्यांच्या पद्धतीने त्यांनी मोर्चा कसा नॅनो होता, हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्या मूलभूत प्रश्नांवर मोर्चा काढण्यात आला. त्याला कुठेही त्यांनी स्पर्श केला नाही. त्यामुळे टीका करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मूलभूत प्रश्नांची उत्तरे दिली असती तर ते योग्य झाले असते. अशी प्रतिटीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.१८) मतदान होत आहे. काँग्रेस नेते, माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जोर्वे गावात मतदान केले. त्यांच्या पत्नी कांचन थोरात, मुलगी जयश्री थोरात यांनीही मतदान केले. त्यानंतर आमदार थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य मी ऐकले. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलतात, महाराष्ट्राची अवहेलना करतात. त्यावर फडणवीस हे एक शब्दही बोलले नाहीत. महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य भारतीय जनता पक्षाकडून होतात. आपले प्रकल्प गुजरातला गेले. महागाई, बेरोजगारी त्यावर देखील ते बोललेले नाही. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला महामोर्चा प्रचंड होता, तो लोकांनी, सर्वांनी पाहिला. मोर्चाला उत्स्फूर्तपणे लोक आलेले होते. असेही आमदार थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस