शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:17 IST

अहमदनगर: गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परंत, पीकविमा कंपनीने वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ...

अहमदनगर: गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परंत, पीकविमा कंपनीने वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नसून, ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे केली केली आहे.

दहातोंडे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात सातत्याने होणारा पाऊस, नैसर्गिक संकटे व अन्य कारणाने शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारी पातळीवर केलेल्या आवाहनानुसार ४ लाख ६६ हजार २४५ शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी १४८ कोटी ६१ लाख रुपये भरले. त्यातून ७४५ कोटी रुपये संरक्षित झाल्याचे सांगितले जाते. पीकविमा भरून एक वर्षांचा कालावधी उलटून गेला. सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. अशा काळात शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यास मोठा आधार होईल. इतर जिल्ह्यात नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली गेली. परंतु, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांकडे विचारणा केली असता ते याबाबत बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. कृषिमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पीक विम्याबाबतची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचेही याकडे लक्ष वेधणार असल्याचे दहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.