शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तेल्या रोगावरील नियंत्रणासाठी कृषी विभाग सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST

केडगाव : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी ...

केडगाव : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच जैविक बुरशीनाशके वापरण्याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी सांगितले.

नगर तालुक्यातील अरणगाव (शिंदेवाडी), खंडाळा व बाबुर्डी येथील डाळिंब बागांची नवले यांनी पाहणी करून तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, कृषी पर्यवेक्षक जालिंदर गांगुर्डे, कृषी सहाय्यक उमेश शेळके यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी किसनराव लोटके, गणेश शिंदे, बन्सी शिंदे, शरद टकले, विक्रम वाळके आदींनी डाळिंब पिकावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून उपाययोजना सुचविल्या.

नवले म्हणाले, तालुक्यात ९५० हेक्टरवर, तर अरणगाव, खंडाळा व बाबुर्डी येथे २०० एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास कमी खर्चात तेल्या रोग नियंत्रणात येईल. मागील १४ वर्षांपासून येथील शेतकरी डाळिंबाचे पीक घेत असून ते अनुभवी आहेत. दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता यामुळे नवीन १ ते दीड वर्षे लागवड झालेल्या पिकावर या रोगाचा फांदी व खोडावर प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत, असे ते म्हणाले.

290521\3103img-20210528-wa0246.jpg

कृषी विभागाकडुन पाहणी