शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

तेल्या रोगावरील नियंत्रणासाठी कृषी विभाग सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST

केडगाव : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी ...

केडगाव : डाळिंब पिकावर (तेल्या रोग) जीवाणूजन्य करपामुळे शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. हा करपा उपाययोजना केल्यानंतर नियंत्रणात येतो. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच जैविक बुरशीनाशके वापरण्याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी सांगितले.

नगर तालुक्यातील अरणगाव (शिंदेवाडी), खंडाळा व बाबुर्डी येथील डाळिंब बागांची नवले यांनी पाहणी करून तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, कृषी पर्यवेक्षक जालिंदर गांगुर्डे, कृषी सहाय्यक उमेश शेळके यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी किसनराव लोटके, गणेश शिंदे, बन्सी शिंदे, शरद टकले, विक्रम वाळके आदींनी डाळिंब पिकावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून उपाययोजना सुचविल्या.

नवले म्हणाले, तालुक्यात ९५० हेक्टरवर, तर अरणगाव, खंडाळा व बाबुर्डी येथे २०० एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास कमी खर्चात तेल्या रोग नियंत्रणात येईल. मागील १४ वर्षांपासून येथील शेतकरी डाळिंबाचे पीक घेत असून ते अनुभवी आहेत. दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. हवामानातील बदल, ढगाळ वातावरण, हवेतील आर्द्रता यामुळे नवीन १ ते दीड वर्षे लागवड झालेल्या पिकावर या रोगाचा फांदी व खोडावर प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत, असे ते म्हणाले.

290521\3103img-20210528-wa0246.jpg

कृषी विभागाकडुन पाहणी