शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

कोकमठाण गावात ‘डेंग्यू’ने शाळकरी मुलीसह दोघांचा बळी

By admin | Updated: August 11, 2016 01:12 IST

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. फरीना अश्पाक सय्यद व गोरक्षनाथ काशिनाथ लोहकणे अशी मयतांची नावे आहेत. कोकमठाण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी व प्रचंड अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होवून ‘डेंग्यू’ सारख्या भयावह रोगाचा फैलाव झाला आहे. वारंवार ताप येणे, हात-पाय दुखणे, सांधे दुखणे, थकवा येणे आदी लक्षणे नागरिकांमध्ये आढळून येत आहेत.दरम्यान ‘डेंग्यू’ची लागण झालेल्या फरीना अश्पाक सय्यद (वय ७) या शाळकरी विद्यार्थिनीचा रविवारी मृत्यू झाला. तर गोरक्षनाथ काशिनाथ लोहकणे (वय २८) या शेतकऱ्याचा मंगळवारी उपचार चालू असताना मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी बुधवारी सकाळी कोकमठाणला भेट देत रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. आरोग्य तपासणीत अजय अण्णासाहेब धीवर (वय १६), गायत्री गोरख गायकवाड (वय २५), मनीषा विजय कांबळे (वय १५), नारायण माधव टेके (वय ७), विजय भगवानदास कांबळे (वय ४४), कालिदास पुंजा धीवर (वय ५३), कन्हैय्या रोहीदास संत (वय ७), जाकीर सरदार मन्सूरी (वय १८), रोहिणी सुभाष दुशींग (वय २७), सुनीता रामदास जाधव (वय ३५) व भाग्यश्री अशोक जाधव (वय १४) अशा ११ जणांना ‘डेंग्यू’ सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. संवत्सरचे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिकेत खोत, मलेरिया पर्यवेक्षक एन. बी. वळवी, विस्तार अधिकारी पी. जी. पाखरे, आरोग्य सहाय्यक टी. ई. माळी, जी. डी. चंदनशीव, आरोग्यसेवक एस. व्ही. महाजन, एस. एन. गांगुर्डे, जे. एस. आवारे, बी. डी. मलीक यांची आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.(प्रतिनिधी)आरोग्य विभागाची ५-६ पथके तयार करण्यात आली असून घरोघरी जावून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पाणीसाठे तपासून डासांची उत्पत्ती थांबविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गावात दोन वेळा औषध फवारणी केली जात आहे. ४गोदावरीला आलेल्या पुरानंतर शहरातील नदीकाठ, बेट, निवारा, गजानननगर, लिंबारा मैदान, इंदिरानगर, १०५ या परिसरात हिवताप, अतिसार, चिकनगुण्या या रोगांनी थैमान घातले आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरी आरोग्याची काळजी घेत आहोत.-सुनील देवकर, सभापती पंचायत समिती