शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

आडते व्यापाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: July 11, 2016 23:53 IST

अहमदनगर : शेतीमाल बाजार समित्यांच्या नियमानातून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शहरासह आडते व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली़

अहमदनगर : शेतीमाल बाजार समित्यांच्या नियमानातून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शहरासह आडते व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली़ दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्ह्यातील फळे व भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापनेच्या सूचना संबंधितांना केल्या़फळे व भाजीपाला बाजार समितीच्या नियमातून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ सरकारच्या या निर्णयाचा शहरासह जिल्ह्यातील आडते व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला़ नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बैठक घेऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ कांदा आडतदार भाजीपाला फळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल झंवर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले़ शिष्टमंडळात संतोष सूर्यवंशी, निखिल वारे आदींचा समावेश होता़ यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, सन १९७२ पासून १० टक्के आडत घेत होते़ शेतीमाल विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आल्यानंतर आडतीचा ६ टक्के झाला़ सध्या व्यापारी या दरानेच आडत वसूल करतात़ त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या मालाचा योग्य भाव आणि पैशाची हमी समिती देते़ असे असताना सरकारने शेतीमाल नियमन मुक्त करण्याचा निर्णय घेतला़ नियमनमुक्ती म्हणजे बाहेर माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बंधन नाही़ याचाच अर्थ मुक्त बाजारामुळे पिढ्यान् पिढ्या व्यापार करणारे बेघर होतील़ त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल़ त्यामुळे हा नियमनमुक्ती कायदा कृषी बाजार समितीतील आवरात व्यापार करणाऱ्यांसाठी लागू करावा़ जेणेकरून बाहेरच्या व्यापाऱ्यांशी स्पर्धा करता येईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनात घोडेगाव, वांबोरी, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, पारनेर, शेवगाव, तिसगाव, संगमनेर येथील कडबा व्यापारी आदींचा समावेश होता़(प्रतिनिधी)उपाययोजना करण्याच्या सूचनानिवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहायक उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस उपधीक्षक, प्रादेशिक परिवन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ बैठकीत जिल्ह्यातील नगर, राहुरी, राहाता, श्रीगोंदा, कर्जत येथील बाजार समित्या सुरू असल्याचे सांगण्यात आले़ तर जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी येथील बाजार समितीचा कारभार बंद आहे़ संगमनेर व अकोले येथील भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या़