शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

नवीन रेल्वे मार्गाची केंद्राकडे मागणी

By admin | Updated: June 27, 2014 00:19 IST

अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात रेल्वे अर्थसंकल्पात नगरची उपेक्षाच झाली़

अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात रेल्वे अर्थसंकल्पात नगरची उपेक्षाच झाली़ यावेळी मात्र तसे होणार नाही़ नगरसाठी नवीन काही रेल्वे मार्गांची मागणी केंद्रीय रेल्वे खात्याकडे करण्यात आली असून, अर्थसंकल्पात नगर रेल्वेसाठी भरीव तरतूद होईल,अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा़सदाशिव लोखंडे यांनी दिली़रेल्वे अर्थसंकल्पाविषयी नगर जिल्ह्याच्या अपेक्षा ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात मुद्देसुदपणे मांडल्या. या अनुषंगाने खा.लोखंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, रेल्वे दळणवळणाचे कमी खर्चाचे साधन आहे़नगरची भराभराट होण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील रेल्वे जाळे वाढविण्याची गरज आहे़ त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, अत्याधुनिक सुविधा रेल्वे स्थानकावर निर्माण केल्या जातील़ रेल्वे स्थानकावर सी़सी़ टीव्ही कॅमेऱ्यासह इतर सुविधाही उपलब्ध केल्या जाणार आहेत़ जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानक अत्याधुनिक केले जाणार आहेत़ नगर-बीड- परळी रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे़या रेल्वे मार्गाची माहिती घेऊन अर्थसंकल्पात या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे़पुणे नाशिक -पुणे नवीन रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसा प्रस्तावही केंद्राकडे देण्यात आला आहे़ पुणे शिर्डी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे़ शिर्डी ते हैद्राबाद रेल्वे सुरू करण्याचा मानस आहे़ भाविकांना शिर्डीला येण्यासाठी अधिकाअधिक रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रवाशांना कमी वेळात आणि कमी खर्चात पुणे, नाशिक, मुंबई आणि हैद्राबादला जाणे शक्य होणार आहे़नगर- मनमाड सध्या एकच रेल्वे लाईन आहे़ त्यामुळे अनेक अडचणी येतात़ रेल्वे वेळेवर पोहोचत नाहीत़ प्रवाशांना ताटकळत बसावे लागते़ मोठ्या रेल्वेंना इथे थांबविणे शक्य होत नाही़ हा प्रश्न सोडविण्यासाठी नगर- मनमाड दुसरी रेल्वे लाईन टाकणे महत्वाचे आहे़ त्यामुळे ही मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे़रेल्वे स्थानकांची दुरवस्था झाली आहे़रेल्वे स्थानके चकाचक करण्यात येणार आहेत़ सुरक्षा व्यवस्था वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे़ रेल्वे स्थानके अद्ययावत करण्यात येणार आहेत़ आम्ही नवीन आहोत़ सर्वच बाबी एकाचवेळी करणे शक्य होणार नाही़ मात्र टप्प्या टप्याने रेल्वेत सुधारणा केली जाईल़ (प्रतिनिधी)