शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

खरीप हंगामासाठी ६० हजार क्विंटल बियाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. या अनुषंगाने जिल्हा ...

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना कृषीविषयक बाबींचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी एकूण ६० हजार ३९२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. त्यातून आज अखेर ६ हजार ४२० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये कापूस बियाण्यासाठी ५ लाख २५ हजार ४७६ पाकिटे (प्रत्येकी ४५० ग्रॅम) एवढा कोटा मंजूर झाला आहे. त्याची प्रत्यक्ष विक्री शेतकऱ्यांना १ जूननंतर करण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय एकूण २ लाख ५५ हजार मेट्रिक टन खताची मागणी केली असून, त्यातून २ लाख ११ हजार मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. आजअखेर १ लाख २६ हजार टन खत उपलब्ध झाले आहे. यापैकी ३१ हजार २८५ टन खताची विक्री झाली असून, ९४ हजार ८०० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी खते आणि बियाणे यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांनी वेळेवर करावा. तसेच शेतकऱ्यांनी खतांची खरेदी एकदाच न करता आवश्यकतेप्रमाणे करावी. खत वितरकांनी पॉस मशीनच्या साह्याने खते वितरित करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.

---------------

शेतकऱ्यांकडून युरियाची मोठी मागणी

शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानुषंगाने १ लाख ५ हजार ८६९ मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली असून, त्यातून ८१ हजार ९१० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यातून ८ हजार ९४९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.

------------

तक्रार निवारण कक्ष, भरारी पथके

बियाणे आणि खतांच्या तक्रार निवारणासाठी निवारण कक्ष व भरारी पथकांची स्थापना तालुका तसेच जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी तक्रार करता येणार आहे.