शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खरीप हंगामासाठी ६० हजार क्विंटल बियाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:21 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. या अनुषंगाने जिल्हा ...

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना कृषीविषयक बाबींचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी एकूण ६० हजार ३९२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. त्यातून आज अखेर ६ हजार ४२० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये कापूस बियाण्यासाठी ५ लाख २५ हजार ४७६ पाकिटे (प्रत्येकी ४५० ग्रॅम) एवढा कोटा मंजूर झाला आहे. त्याची प्रत्यक्ष विक्री शेतकऱ्यांना १ जूननंतर करण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय एकूण २ लाख ५५ हजार मेट्रिक टन खताची मागणी केली असून, त्यातून २ लाख ११ हजार मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. आजअखेर १ लाख २६ हजार टन खत उपलब्ध झाले आहे. यापैकी ३१ हजार २८५ टन खताची विक्री झाली असून, ९४ हजार ८०० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी खते आणि बियाणे यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांनी वेळेवर करावा. तसेच शेतकऱ्यांनी खतांची खरेदी एकदाच न करता आवश्यकतेप्रमाणे करावी. खत वितरकांनी पॉस मशीनच्या साह्याने खते वितरित करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.

---------------

शेतकऱ्यांकडून युरियाची मोठी मागणी

शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानुषंगाने १ लाख ५ हजार ८६९ मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली असून, त्यातून ८१ हजार ९१० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यातून ८ हजार ९४९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.

------------

तक्रार निवारण कक्ष, भरारी पथके

बियाणे आणि खतांच्या तक्रार निवारणासाठी निवारण कक्ष व भरारी पथकांची स्थापना तालुका तसेच जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी तक्रार करता येणार आहे.