शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

३१ प्रस्तावांच्या मंजुरीस विलंब

By admin | Updated: May 29, 2014 00:27 IST

अहमदनगर: उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके चांगलेच वर काढले आहे. १६० गावे व ६४२ वाड्यांवरील नागरिकांची तहान भागविण्यासाठी २१३ टॅँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

अहमदनगर: उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके चांगलेच वर काढले आहे. १६० गावे व ६४२ वाड्यांवरील नागरिकांची तहान भागविण्यासाठी २१३ टॅँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे आणखी ३१ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत देण्यात आली. दररोज ५४९ टॅँकरच्या खेपा सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील २० खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाईच्या कालावधीत ६९४ विंधन विहिरी घेण्याचे नियोजन होते. त्यातील भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४५० प्रस्ताव पात्र असल्याचे कळविले आहे. त्यापैकी १२१ विंधन विहिरी घेण्याच्या प्रस्तावास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. ७७ विंधन विहिरी घेण्यात आल्या असून ७६ विहिरींना पाणी लागले आहे. ३४ हातपंप बसविण्यात आले असून ४२ हातपंप बसविणे बाकी आहे. शेवगाव १५, पाथर्डी ४, कोपरगाव, २, जामखेड ३, अकोले २ व नेवासा १ टॅँकरचे प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब लागत असल्याची बाब सभेत अधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली. ज्या गावात टॅँकरने पाणी पुरवठा सुरू आहे त्या गावातील उद्भव पुनर्भरण करण्यात येणार आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत या कामांचा सर्व्हे केला जाणार आहे. पात्र प्रस्ताव मंजुरीबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक गोस्की यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपाध्यक्ष मोनिका राजळे, विषय समित्यांचे सभापती कैलास वाकचौरे, बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, शारदा भोरे, सुदाम पवार उपस्थित होते.(प्रतिनिधी) जिल्ह्यात अजूनही ६८ हजार दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांकडे शौचालये नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत ‘अस्मिता’ उपक्रमांतर्गत प्रती शौचालय १० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. संबंधित कुटुंबांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची बिले शासनाने शंभर टक्के भरावीत अशी मागणी शासनाकडे करावी अशी सूचना सदस्य सुनील गडाख यांनी केली. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची ५ कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा परिषदेला देण्याची मागणी सदस्य सुभाष पाटील यांनी केली.