शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

३१ प्रस्तावांच्या मंजुरीस विलंब

By admin | Updated: May 29, 2014 00:27 IST

अहमदनगर: उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके चांगलेच वर काढले आहे. १६० गावे व ६४२ वाड्यांवरील नागरिकांची तहान भागविण्यासाठी २१३ टॅँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

अहमदनगर: उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके चांगलेच वर काढले आहे. १६० गावे व ६४२ वाड्यांवरील नागरिकांची तहान भागविण्यासाठी २१३ टॅँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे आणखी ३१ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत देण्यात आली. दररोज ५४९ टॅँकरच्या खेपा सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील २० खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाईच्या कालावधीत ६९४ विंधन विहिरी घेण्याचे नियोजन होते. त्यातील भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४५० प्रस्ताव पात्र असल्याचे कळविले आहे. त्यापैकी १२१ विंधन विहिरी घेण्याच्या प्रस्तावास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. ७७ विंधन विहिरी घेण्यात आल्या असून ७६ विहिरींना पाणी लागले आहे. ३४ हातपंप बसविण्यात आले असून ४२ हातपंप बसविणे बाकी आहे. शेवगाव १५, पाथर्डी ४, कोपरगाव, २, जामखेड ३, अकोले २ व नेवासा १ टॅँकरचे प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब लागत असल्याची बाब सभेत अधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली. ज्या गावात टॅँकरने पाणी पुरवठा सुरू आहे त्या गावातील उद्भव पुनर्भरण करण्यात येणार आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत या कामांचा सर्व्हे केला जाणार आहे. पात्र प्रस्ताव मंजुरीबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक गोस्की यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपाध्यक्ष मोनिका राजळे, विषय समित्यांचे सभापती कैलास वाकचौरे, बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, शारदा भोरे, सुदाम पवार उपस्थित होते.(प्रतिनिधी) जिल्ह्यात अजूनही ६८ हजार दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांकडे शौचालये नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत ‘अस्मिता’ उपक्रमांतर्गत प्रती शौचालय १० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. संबंधित कुटुंबांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची बिले शासनाने शंभर टक्के भरावीत अशी मागणी शासनाकडे करावी अशी सूचना सदस्य सुनील गडाख यांनी केली. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची ५ कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा परिषदेला देण्याची मागणी सदस्य सुभाष पाटील यांनी केली.