शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बाष्पीभवनाच्या नावाखाली जायकवाडीचा टक्का घटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 12:54 IST

जलसंपदा विभागाने चालूवर्षी सादर केलेल्या पाणी वापराच्या फेरनियोजनानुसार जायकवाडी धरणातील ११ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते.

अहमदनगर : जलसंपदा विभागाने चालूवर्षी सादर केलेल्या पाणी वापराच्या फेरनियोजनानुसार जायकवाडी धरणातील ११ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. परंतु, प्रशासनाने मूळ प्रकल्पाच्या मंजुरीच्या आधारे हे प्रमाण २६ टक्यांवर नेले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या ७ दशलक्ष घनफूट पाणी जास्त असल्याने नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी नगर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून होत आहे.समन्यायी कायद्यातील स्टेज क्रमांक तीनच्या आधारे जायकवाडी धरणात नगरसह नाशिक जिल्ह्यातून ६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची मागणी पुढे आली आहे. जायकवाडीतील पाणी वापराचा ताळेबंद मांडताना पाण्याचे बाष्पीभवन २६ टक्के एवढे गृहीत धरले गेले. हा ताळेबंद प्रशासनाने सन १९७६ मधील आकडेवारीच्या आधारे मांडला आहे. परंतु, चालूवर्षी १२ सप्टेंबर २०१८ मध्ये जायकवाडी धरणातील पाण्याचे फे रनियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ११ टक्के म्हणजे ३२३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. याचाच अर्थ धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन दुप्पट दाखविले गेल्याने उपयुक्त पाणीसाठ्यात ७ दशलक्ष घनफुटाची कागदोपत्री घट झालेली दिसते़ प्रत्यक्षात जायकवाडी धरणात सद्यस्थितीत ७ दशलक्ष घनफूट पाणी जास्त आहे. त्यामुळे नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणांतून ६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी अयोग्य असून, हे पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी बाजू नाशिक व नगर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील बैठकीत मांडली.समन्यायी कायद्यानुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा अपेक्षित आहे. चालूवर्षीच्या फेरनियोजनाची आकडेवारी पाहता जायकवाडीत आज ६५ टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणांतून ६ दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यास तेवढेच पाणी वाया जाईल.जायकवाडीला मुळा, गोदावरी आणि प्रवरा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे़ दुष्काळ असल्याने या नद्या कोरड्या आहेत. त्यामुळे ५० टक्के पाणी वाया जाईल. वाया जाणा-या पाण्याचा उल्लेख समन्यायी कायद्यात नाही. त्यामुळे जायकवाडीला फेरनियोजनाचा बांध असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.या प्रकल्पांनाही समन्यायीचा न्याय द्यासंगमनेर तालुक्यातील नऊ, पारनेर तालुक्यातील आठ आणि पाथर्डी तालुक्यातील आठ प्रकल्प कोरडे आहेत. समन्यायी कायद्याची अंमलबजावणी करायची झाल्यास वरील प्रकल्पांतही पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.प्राधान्य कायद्याला की आदेशालासमन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडणे अपेक्षित आहे़ परंतु, जलसंपदा विभागाच्या १२ सप्टेंबर २०१८ च्या आदेशाचे पालन केल्यास हे पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असे प्रशासकीय अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे समन्यायी कायदा व फेरनियोजनाचा आदेश, याचा आढावा घेऊन पुढील निर्णय होणार आहे.आवर्तन लांबणाररब्बीसाठी मुळा धरणातून एक आवर्तन सोडले जाणार आहे़ परंतु, समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय प्रलंबित असल्याने मुळाचे आवर्तनही लांबणार आहे़ त्यामुळे रब्बीच्या पेरणीवर परिणाम होणार आहे.पाणी सोडल्यास ९ तालुक्यांना बसणार फटकागोदावरी खो-यातील राहुरी, कोपरगाव, अकोला, संगमनेर, राहाता, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, पारनेर या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय