शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन’ : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 15:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर ...

ठळक मुद्देबुलेट ट्रेनचा महाराष्ट्रावर विनाकारण बोजाया प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. नंतर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला.शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर त्या खर्चाचा बोजा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करायला हवा होता. शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही’, असा टोमणा मारत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत राज्य, तसेच केंद्र शासनावर टीका केली.कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त नगरला आले असता, पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शासनावर नेम धरला. मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेन सुरू करण्यास विरोध नाही. परंतु या बुलेट ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्रालाही काहीच फायदा नाही. या प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत. अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन आहेत, त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. उर्वरित स्टेशन गुजरातच्या हद्दीत असल्याने त्याचा जास्त लाभ गुजरातलाच आहे. महाराष्ट्रावर याचा विनाकारण बोजा पडतो आहे, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी करायला हवा होता. बुलेट ट्रेन करायचीच होती तर ती मुंबई-दिल्ली अशी करायची होती. मग त्याचा बºयाच राज्यांना फायदा झाला असता. महाराष्ट्रात करायची होती तर चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी करायची, मग त्याचा राज्याला लाभ झाला असता, असे मुद्दे अधोरेखित करत शरद पवार यांनी बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. हळूहळू त्यात बदल होत गेले, नंतर तर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला. त्यामुळे शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही. आता पाहू कधी जेवायला मिळतंय ते, असा टोमणा पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला मारला.शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही, त्यासाठी आधी बाहेर पडा, मग आमच्यासारखे रस्त्यावर या, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेलाही पट्ट्यात घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अंकुश काकडे, आ. अरूण जगताप, संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.