शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मारहाणीत चोरट्यांचा मृत्यू

By admin | Updated: October 23, 2014 14:51 IST

चोर समजून ग्रामस्थांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोघा जणांचा नगरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

पारनेर : चोर समजून ग्रामस्थांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोघा जणांचा नगरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास तालुक्यातील अळकुटी येथे ही घटना घडली होती. 
दोघा जणांच्या मृत्युमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याचा धोका आहे. याप्रकरणी आता पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अळकुटी येथे सोमवारी रात्रीपासून चोरट्यांनी घोलप मळा, पुंडे मळासह गावामध्ये चोरीचा प्रयत्न केला. साधारण चार ते पाच जणांच्या टोळीकडून हा प्रयत्न सुरु असताना अळकुटी गावातील ग्रामस्थ जागे झाले. व त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.
लोणीमावळा रस्त्यानजीक पहाटे पाचच्या दरम्यान या चोरट्यांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती समजली.
दरम्यान, या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिलेला असला तरी अधिक माहिती देण्यास त्यांनी मात्र नकार दिला. हे चौघे चोरी करताना पकडले की संशय घेऊन पकडले याची माहिती अजून समोर आली नसल्याने अळकुटी परिसरात घबराटीचे वातावरण आहे.  पारनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. 
(तालुका प्रतिनिधी) 
-----------------------
बेदम मारहाणीत दोघा जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अळकुटीतील अनेक जणांच्या अंगलट हा प्रकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मारहाणीविषयी अळकुटीत कानोसा घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांनी मौन बाळगले आहे.
-----------------------
श्रीगोंदा : श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील जीवघेण्या दरोड्यांची जिल्हा पोलीस प्रमुखांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. दरोड्यांच्या या मालिकांना ब्रेक लावण्यासाठी शस्त्रधारी पोलिसांचे दरोडा नियंत्रण पथक नेमण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. 
गेल्या दहा वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यात पडलेल्या दरोड्यात १५ जणांचा बळी गेला आहे. परंतु एकाही दरोड्याचा यशस्वीरित्या तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. 
मागील आठवड्यात निमगाव खलू येथील दरोड्यात वच्छलाबाई जठार या महिलेचा बळी गेला. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.
जिल्हा पोलीस प्रमुख लखमी गौतम यांनी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन श्रीगोंदा, कर्जत, जामखेडसाठी दरोडे नियंत्रण पथकाची नियुक्ती केली. हे पथक रात्री गस्त, नाकेबंदी करणार आहे. तसेच मागील दरोड्यांच्या तपासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. 
दरोड्यासाठी संवेदनशील असलेल्या काष्टी, आढळगाव, बारडगाव, बेलवंडी परिसरात दरोडे नियंत्रण पथकाची करडी नजर राहणार आहे. या पथकामुळे दरोड्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्‍वास कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी व्यक्त केला. 
(तालुका प्रतिनिधी)