शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे दिवासाआड पाणी

By | Updated: December 5, 2020 04:33 IST

अहमदनगर : मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे नगरकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सक्षम ...

अहमदनगर : मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे नगरकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावर कळस असा की, केडगाव व कल्याण रोड परिसरात पाच ते सहा दिवसांनी पाणी येते.

नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होताे. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे २६ हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरण पूर्ण भरले होते. तसेच जायकवाडी धरणातही पाणी सोडण्यात आले होते. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला दरराेज पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने वितरण व्यवस्था सक्षम बनविण्याकडे सातत्याने दर्लक्ष केले. त्यात शहरातील लोकवस्ती वाढल्याने हद्दवाढीतील भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधींच्या पाणी योजना सुरू होऊन बराच काळ लोटला. परंतु, पाणीयोजना कार्यान्वित झालेल्या नाहीत.

मुळा धरणातून पाणीउपसा करून हे पाणी विळदघाट येथील उपकेंद्रात साठविले जाते. तेथून ते वसंत टेकडी येथील जलकुंभात साेडले जाते. वसंतटेकडी येथे ७० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा होताे. शहरात जुने २० जलकुंभ आहेत. शहर सुधारित पाणी योजनेंतर्गत नव्याने ८ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तसेच अमृत योजनेंतर्गत मुळा धरणातून नव्याने ३५ कि. मी. ची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे कामही अधर्वट असल्याने शहराला जुन्या जलवाहिनीतूनच पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी जुनी झाल्याने तिला गळती लागली आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

.....

प्रतिमानसी ८० लिटर पाणी

शहरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी द्यावे, असा संकेत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातूनही पुरेसे पाणी आहे. सन २०११ च्या जनगणेनुसार ३ लाख ५० हजार इतकी शहराची लोकसंख्या आहे. प्रत्येक व्यक्तीला सध्या ८० लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

....

२० टक्के पाणी गळती

मुळा धरण ते वसंतटेकडी हे अंतर ३५ कि.मी. इतके आहे. या मार्गावर २० टक्के पाण्याची गळती सुरू आहे. मुळा धरणातून उपसा केलेल्या पाण्यापैकी ८० टक्केच पाणी शहराला मिळते.

.....

फेज-२ ११६ कोटींवरून १२३ कोटींवर

शहराच्या पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन सन २०१० मध्ये शासनाने फेज-२ योजना मंजूर केली. सुमारे ११६ कोटींची ही योजना होती. मात्र, वेळेत पूर्ण न झाल्याने सदर योजना १२३ कोटींवर पोहोचली आहे.

.....

फेज-२ ला सात वर्षांची मुदतवाढ

शासनाने मंजूर केलेल्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सन २०१० मध्ये सुरू झाले. ही योजना पूर्ण करण्यासाठी २०१३ पर्यंत मुदत होती. परंतु, सदर योजना मुदतीत पूर्ण झाली नाही. त्यामुळे २०१३ ते २०२० या काळात वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. सात वर्षे उलटूनही ही योजना पूर्ण झाली नाही.

....

चाचणीविना नळजोडणी लांबणीवर

शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात ५६५ कि.मी. भूमिगत पाईप टाकण्यात आले आहेत. परंतु, या पाईपची चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नळजोडणी देण्यात आलेली नाही.

....

दुसऱ्या अमृत पाणी योजनेची मुदतही संपली

केंद्र शासनाने अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. सुमारे १०० कोटी खर्चून मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंत ३५ कि. मी. ची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत २२ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

....

- शहर सुधारित पाणीपुवठा व अमृत योजना येत्या मार्चपर्यंत पूर्ण हाेतील. विळघाट येथे वीज उपलब्ध होण्यासाठीची मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराला उन्हाळ्यात दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

- गणेश गाडळकर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा