शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

‘दासबोध’ घराघरांत वाचला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ ...

संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ आहे. म्हणूनच जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करून मांडलेले तत्त्वज्ञान ‘दासबोध’च्या माध्यमातून घराघरांत पोचविले पाहिजे. दासबोधरूपाने समर्थ रामदासस्वामींची कीर्ती अजरामर आहे, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

दासनवमीनिमित्त येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमात जाखडी बोलत होते. व्यासपीठावर संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, बापू दाणी, अभय देशपांडे, सतीश देशपांडे, निलेश पुराणिक, विशाल जाखडी, राजू क्षीरसागर, सागर काळे उपस्थित होते. संत रामदासस्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

संत रामदासस्वामींनी मरगळ आलेल्या समाजात मोठी जागृती केली. तरुणांना बलोपासनेसाठी प्रवृत्त केले. त्यासाठी अनेक ठिकाणी हनुमानाची देवालये उभारली. तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचंड भ्रमंती केली. सर्व ठिकाणच्या हालचाली डोळसपणे टिपल्या. परकीय आक्रमकांना थोपविण्यासाठी देव, देश आणि धर्म यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा बलशाली समाज ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने जीवनभर कार्य केले. त्यांना प्रचंड मोठा शिष्य परिवार लाभला. दासबोधरूपाने त्यांची कीर्ती अजरामर आहे, असे जाखडी म्हणाले.

यावेळी प्रा. सतीश देशपांडे यांनीही समर्थांच्या जीवनकार्यावर विचार मांडले.