शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

‘दासबोध’ घराघरांत वाचला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ ...

संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ आहे. म्हणूनच जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करून मांडलेले तत्त्वज्ञान ‘दासबोध’च्या माध्यमातून घराघरांत पोचविले पाहिजे. दासबोधरूपाने समर्थ रामदासस्वामींची कीर्ती अजरामर आहे, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

दासनवमीनिमित्त येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमात जाखडी बोलत होते. व्यासपीठावर संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, बापू दाणी, अभय देशपांडे, सतीश देशपांडे, निलेश पुराणिक, विशाल जाखडी, राजू क्षीरसागर, सागर काळे उपस्थित होते. संत रामदासस्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

संत रामदासस्वामींनी मरगळ आलेल्या समाजात मोठी जागृती केली. तरुणांना बलोपासनेसाठी प्रवृत्त केले. त्यासाठी अनेक ठिकाणी हनुमानाची देवालये उभारली. तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचंड भ्रमंती केली. सर्व ठिकाणच्या हालचाली डोळसपणे टिपल्या. परकीय आक्रमकांना थोपविण्यासाठी देव, देश आणि धर्म यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा बलशाली समाज ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने जीवनभर कार्य केले. त्यांना प्रचंड मोठा शिष्य परिवार लाभला. दासबोधरूपाने त्यांची कीर्ती अजरामर आहे, असे जाखडी म्हणाले.

यावेळी प्रा. सतीश देशपांडे यांनीही समर्थांच्या जीवनकार्यावर विचार मांडले.