शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘दासबोध’ घराघरांत वाचला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ ...

संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ आहे. म्हणूनच जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करून मांडलेले तत्त्वज्ञान ‘दासबोध’च्या माध्यमातून घराघरांत पोचविले पाहिजे. दासबोधरूपाने समर्थ रामदासस्वामींची कीर्ती अजरामर आहे, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

दासनवमीनिमित्त येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमात जाखडी बोलत होते. व्यासपीठावर संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, बापू दाणी, अभय देशपांडे, सतीश देशपांडे, निलेश पुराणिक, विशाल जाखडी, राजू क्षीरसागर, सागर काळे उपस्थित होते. संत रामदासस्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

संत रामदासस्वामींनी मरगळ आलेल्या समाजात मोठी जागृती केली. तरुणांना बलोपासनेसाठी प्रवृत्त केले. त्यासाठी अनेक ठिकाणी हनुमानाची देवालये उभारली. तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचंड भ्रमंती केली. सर्व ठिकाणच्या हालचाली डोळसपणे टिपल्या. परकीय आक्रमकांना थोपविण्यासाठी देव, देश आणि धर्म यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा बलशाली समाज ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने जीवनभर कार्य केले. त्यांना प्रचंड मोठा शिष्य परिवार लाभला. दासबोधरूपाने त्यांची कीर्ती अजरामर आहे, असे जाखडी म्हणाले.

यावेळी प्रा. सतीश देशपांडे यांनीही समर्थांच्या जीवनकार्यावर विचार मांडले.