शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे डांबरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 12:28 IST

गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना.

ठळक मुद्देरस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला.एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे.एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत.

अहमदनगर : गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना. तीन दिवसांत डांबरीकरणास सुरूवात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दरेवाडी-उक्कडगाव-मांडवा या रस्त्याचे काम रखडले होते. चालू आर्थिक वर्षात या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे. एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत. खडीकरणाचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण झाले. पुढे पावसाचे दिवस सुरू झाल्याने डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाचे चार महिने उलटून गेले आहेत. पाऊस थांबून महिना झाला, तरी डांबरीकरणाचे काम करण्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार डोळेझाक करीत आहेत.कधी नव्हे तो गेल्या बारा वर्षांतून एकदा या रस्त्याला मुहूर्त लागला. खडीकरणानंतर डांबरीकरणही पूर्ण होऊन या रस्त्याचा एकादाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा होती. परंतु डांबरीकरण रखडल्याने या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येत्या तीन दिवसांत डांबरीकरणाचे काम झाले नाही, तर जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नारायणडोहो, उक्कडगाव, तसेच मांडवे येथील नागरिकांनी दिला आहे.

अधिका-यांचे आश्वासन हवेत

या रस्याचे डांबरीकरण आॅक्टोबरअखेर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. परंतु महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याने त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. गुरूवारी पुन्हा कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग