शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे डांबरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 12:28 IST

गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना.

ठळक मुद्देरस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला.एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे.एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत.

अहमदनगर : गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना. तीन दिवसांत डांबरीकरणास सुरूवात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दरेवाडी-उक्कडगाव-मांडवा या रस्त्याचे काम रखडले होते. चालू आर्थिक वर्षात या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे. एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत. खडीकरणाचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण झाले. पुढे पावसाचे दिवस सुरू झाल्याने डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाचे चार महिने उलटून गेले आहेत. पाऊस थांबून महिना झाला, तरी डांबरीकरणाचे काम करण्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार डोळेझाक करीत आहेत.कधी नव्हे तो गेल्या बारा वर्षांतून एकदा या रस्त्याला मुहूर्त लागला. खडीकरणानंतर डांबरीकरणही पूर्ण होऊन या रस्त्याचा एकादाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा होती. परंतु डांबरीकरण रखडल्याने या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येत्या तीन दिवसांत डांबरीकरणाचे काम झाले नाही, तर जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नारायणडोहो, उक्कडगाव, तसेच मांडवे येथील नागरिकांनी दिला आहे.

अधिका-यांचे आश्वासन हवेत

या रस्याचे डांबरीकरण आॅक्टोबरअखेर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. परंतु महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याने त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. गुरूवारी पुन्हा कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग