शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे डांबरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 12:28 IST

गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना.

ठळक मुद्देरस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला.एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे.एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत.

अहमदनगर : गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला जाग येईना. तीन दिवसांत डांबरीकरणास सुरूवात न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दरेवाडी-उक्कडगाव-मांडवा या रस्त्याचे काम रखडले होते. चालू आर्थिक वर्षात या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मार्च २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. एकूण २.७४ कोटी रुपये खर्चाचे हे काम मनीषा इन्फ्राकॉम प्रा. लि. यांच्याकडे आहे. एकूण ६.४८ लांबीचा हा रस्ता असून, त्यावर साडेबारा फूट रूंद डांबरीकरण आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सव्वासहा फूट रुंदीच्या साइडपट्ट्या होणार आहेत. खडीकरणाचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण झाले. पुढे पावसाचे दिवस सुरू झाल्याने डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाचे चार महिने उलटून गेले आहेत. पाऊस थांबून महिना झाला, तरी डांबरीकरणाचे काम करण्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार डोळेझाक करीत आहेत.कधी नव्हे तो गेल्या बारा वर्षांतून एकदा या रस्त्याला मुहूर्त लागला. खडीकरणानंतर डांबरीकरणही पूर्ण होऊन या रस्त्याचा एकादाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा होती. परंतु डांबरीकरण रखडल्याने या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येत्या तीन दिवसांत डांबरीकरणाचे काम झाले नाही, तर जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नारायणडोहो, उक्कडगाव, तसेच मांडवे येथील नागरिकांनी दिला आहे.

अधिका-यांचे आश्वासन हवेत

या रस्याचे डांबरीकरण आॅक्टोबरअखेर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. परंतु महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याने त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. गुरूवारी पुन्हा कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग