शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

टंचाईचे संकट : २० दिवसांचा साठा शिल्लक

By admin | Updated: April 7, 2017 14:55 IST

शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो.

कोपरगाव : कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन दरवर्षी कोलमडते. शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यातच तब्बल ५१ टक्के पाण्याची तूट होत असल्याने यंदाच्या कडक उन्हाळ्यात कोपरगावकरांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ७० हजारावर आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी नगरपालिकेने एकूण ८.२० दलघफू क्षमतेचे ४ साठवण तलाव बांधले आहेत. मात्र त्यात सध्या २३ कोटी २० लाख लिटर इतके पाणी शिल्लक आहे. प्रती माणसी १०० लिटर पाणी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार शहराला दररोज ११ लाख २५ हजार लिटर पाणी लागते. परंतु बाष्पीभवन, वहनातील तूट, गाळाने तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तर तब्बल ५१ टक्के पाणी गळतीत वाया जाते. सध्या शहराला ६ दिवसाआड केवळ ४५ मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. शिल्लक पाणी साठा किमान २० दिवस पुरेल इतका आहे. पाणी योजनांवरील २ जलशुध्दीकरण केंद्रे चालू असून नवीन ४२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच तेही कार्यान्वित होईल. गोदावरी कालव्यांना पाणी आल्यास ४ दिवसाआड पाणी पुरवठा करता येतो. मागील वर्षी उन्हाळ्यात २१ दिवसाआड पाणी पुरवठा केला गेला. पालिकेवर तीच नामुष्की पुन्हा ओढावण्याची भीती आहे.शहर हद्दीबाहेर २५ लाख लिटर पाणी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना ३ लाख लिटर पाणी दिले जाते. तर शहर हद्दीबाहेर शिवारातील ओम नगर, शंकर नगर, कर्मवीर नगर, द्वारका नगर व गवारे नगर तसेच जेऊर पाटोदा व कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत २५ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. १५ मेपर्यंत शिल्लक पाणी साठा पुरणार नगरपालिकेने उपलब्ध पाणी साठ्यांचा विचार करता ४ दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास २ मे, ५ दिवसाआड केल्यास ९ मे व ६ दिवसाआड केल्यास १५ मेपर्यंत शिल्लक साठा उपयोगात आणता येईल. पाटबंधारे खात्याने गोदावरी नदीला १९ मे रोजी आवर्तन सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १५ ते १९ मे दरम्यान ४ दिवस निर्जळी राहणार आहे.