शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तलाठ्यास धक्काबुक्की : सरपंच गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:43 IST

गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करणारे तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ चंद्रभान माळी यांच्यासह दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.

कोपरगाव : गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करणारे तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ चंद्रभान माळी यांच्यासह दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.पोलिसांची माहिती अशी मोर्वीस गावचे सरपंच एकनाथ माळी व निलेश गोरख वाघ हे दोघे जण तालुक्यातील मंजुर शिवारातील गोदावरी नदी पात्रातुन विना परवाना बेकायदा वाळू उपसा करीत असताना तलाठी भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे चिडून माळी व वाघ यांनी तलाठी शिंदे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा प्रकार २१ फेब्रवारी रोजी घडला. याप्रकरणी तलाठी शिंदे यांनी दिलेल्या फियार्दीवरून तालुका पोलिसांनी सरपंच माळी व त्यांचा साथीदार वाघ अशा दोघा जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र घटनेपासून दोघेही फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशिद, चंद्रकांत तोर्वेकर व पी.व्ही. कुळधर, अशोक शिंदे, असिर सय्यद यांच्या पथकाने गुरूवारी पहाटे सव्वा चार वाजता मोर्वीस गावात सापळा लावून सरपंच माळी यांना त्यांच्या राहत्या घरातुन ताब्यात घेतले. तर वाघ यास बदापूर(ता.येवला) येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपए किमतीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाच्या ट्रॉलीसह ३ हजार ५०० रूपयांची १ ब्रास वाळू अज्ञात ठिकाणी लपवून ठेवली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव