शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पालखेड कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील बंधारे भरून द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील पालखेड कालव्याचे पाणी येवला तालुक्यातील बोकटेपर्यंत आलेले आहे. याच कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांतील बंधारे ...

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील पालखेड कालव्याचे पाणी येवला तालुक्यातील बोकटेपर्यंत आलेले आहे. याच कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांतील बंधारे तातडीने भरून द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघातील पूर्व भागातील तिळवणी, सावळगाव, शिरसगाव, आपेगाव ही गावे पालखेड कालवा लाभक्षेत्रात येतात. जिरायती भागातील ही गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरी कोरड्या झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागासाठी पालखेड कालव्यातील पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.