शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

तालुक्याच्या कारभाऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला ...

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत लक्ष घालण्याची गळ कार्यकर्ते तालुक्याच्या कारभाऱ्यांना घालत आहेत. त्यामुळे आता कुठे कुठे घालू लक्ष, असे म्हणण्याची वेळ तालुक्याच्या कारभाऱ्यांवर ओढवली आहे.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत निवडणुका झाल्या नाही. कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. प्रचाराचा शुभारंभ नेत्यांच्याच हस्ते करायचा, असा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका होत असल्याने नेत्यांना ते शक्य नाही. विधानसभेसह इतर निवडणुकांत गावोगावचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा संभाळतात. गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असते. गावातील मंडळे तयार करताना तालुक्यातील कारभाऱ्यांना लक्ष घालावे लागते. कार्यकर्तेही नेत्यांना विचारून पुढचा निर्णय घेतात. काही ठिकाणी तर दोन्ही मंडळे एकाच नेत्यांची आहेत. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला; पण यश आले नाही. त्यामुळे दोन्ही मंडळांच्या प्रचाराला कसे जायचे, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. दोन्ही मंडळं आपलीच, असे काही नेते सांगत असून, काहींनी गावातल्या राजकारणात मला ओढू नका, तुमचे तुम्हीच ठरवा काय ते, असे तालुक्याचे कारभारी स्पष्टपणे सांगत आहेत; पण अशी स्पष्ट भूमिका घेणारे फारच कमी आहेत. त्यात राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे नेत्यांना, इतर मित्रपक्षांच्या मंडळांना दुखावता येत नाही. त्यामुळे त्यांचीही अडचणच झाली असून, आता तर जिल्हा बँकेची मतदारयादीही जाहीर झाली आहे. बँकेची निवडणूक कोणत्याहीक्षणी जाहीर होऊ शकते. तालुक्यातील नेत्यांना या निवडणुकीचीही तयारी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने रणनिती आखली जात असून, सर्वच आघाड्यांवर नेत्यांना काम करावे लागत आहे.

....

नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जात आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील नेतेही हजेरी लावत असून, उमेदवारांना पाठबळ देत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका आल्याने त्यांना सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नेत्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.