शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याच्या कारभाऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला ...

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत लक्ष घालण्याची गळ कार्यकर्ते तालुक्याच्या कारभाऱ्यांना घालत आहेत. त्यामुळे आता कुठे कुठे घालू लक्ष, असे म्हणण्याची वेळ तालुक्याच्या कारभाऱ्यांवर ओढवली आहे.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत निवडणुका झाल्या नाही. कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. प्रचाराचा शुभारंभ नेत्यांच्याच हस्ते करायचा, असा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका होत असल्याने नेत्यांना ते शक्य नाही. विधानसभेसह इतर निवडणुकांत गावोगावचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा संभाळतात. गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असते. गावातील मंडळे तयार करताना तालुक्यातील कारभाऱ्यांना लक्ष घालावे लागते. कार्यकर्तेही नेत्यांना विचारून पुढचा निर्णय घेतात. काही ठिकाणी तर दोन्ही मंडळे एकाच नेत्यांची आहेत. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला; पण यश आले नाही. त्यामुळे दोन्ही मंडळांच्या प्रचाराला कसे जायचे, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. दोन्ही मंडळं आपलीच, असे काही नेते सांगत असून, काहींनी गावातल्या राजकारणात मला ओढू नका, तुमचे तुम्हीच ठरवा काय ते, असे तालुक्याचे कारभारी स्पष्टपणे सांगत आहेत; पण अशी स्पष्ट भूमिका घेणारे फारच कमी आहेत. त्यात राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे नेत्यांना, इतर मित्रपक्षांच्या मंडळांना दुखावता येत नाही. त्यामुळे त्यांचीही अडचणच झाली असून, आता तर जिल्हा बँकेची मतदारयादीही जाहीर झाली आहे. बँकेची निवडणूक कोणत्याहीक्षणी जाहीर होऊ शकते. तालुक्यातील नेत्यांना या निवडणुकीचीही तयारी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने रणनिती आखली जात असून, सर्वच आघाड्यांवर नेत्यांना काम करावे लागत आहे.

....

नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जात आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील नेतेही हजेरी लावत असून, उमेदवारांना पाठबळ देत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका आल्याने त्यांना सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नेत्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.