शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

तालुक्याच्या कारभाऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला ...

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्ह्यात ग्रामपंचायतीपाठोपाठ तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार याद्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत लक्ष घालण्याची गळ कार्यकर्ते तालुक्याच्या कारभाऱ्यांना घालत आहेत. त्यामुळे आता कुठे कुठे घालू लक्ष, असे म्हणण्याची वेळ तालुक्याच्या कारभाऱ्यांवर ओढवली आहे.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत निवडणुका झाल्या नाही. कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. प्रचाराचा शुभारंभ नेत्यांच्याच हस्ते करायचा, असा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका होत असल्याने नेत्यांना ते शक्य नाही. विधानसभेसह इतर निवडणुकांत गावोगावचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा संभाळतात. गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असते. गावातील मंडळे तयार करताना तालुक्यातील कारभाऱ्यांना लक्ष घालावे लागते. कार्यकर्तेही नेत्यांना विचारून पुढचा निर्णय घेतात. काही ठिकाणी तर दोन्ही मंडळे एकाच नेत्यांची आहेत. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला; पण यश आले नाही. त्यामुळे दोन्ही मंडळांच्या प्रचाराला कसे जायचे, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. दोन्ही मंडळं आपलीच, असे काही नेते सांगत असून, काहींनी गावातल्या राजकारणात मला ओढू नका, तुमचे तुम्हीच ठरवा काय ते, असे तालुक्याचे कारभारी स्पष्टपणे सांगत आहेत; पण अशी स्पष्ट भूमिका घेणारे फारच कमी आहेत. त्यात राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे नेत्यांना, इतर मित्रपक्षांच्या मंडळांना दुखावता येत नाही. त्यामुळे त्यांचीही अडचणच झाली असून, आता तर जिल्हा बँकेची मतदारयादीही जाहीर झाली आहे. बँकेची निवडणूक कोणत्याहीक्षणी जाहीर होऊ शकते. तालुक्यातील नेत्यांना या निवडणुकीचीही तयारी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने रणनिती आखली जात असून, सर्वच आघाड्यांवर नेत्यांना काम करावे लागत आहे.

....

नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जात आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील नेतेही हजेरी लावत असून, उमेदवारांना पाठबळ देत आहेत; मात्र एकाचवेळी निवडणुका आल्याने त्यांना सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नेत्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.